शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:08 IST

शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता.

ठळक मुद्दे चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

औरंगाबाद : ‘लोकांना बदल हवा होता’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता. क्षणाक्षणाला उत्सुकता ताणली जात होती. जो जिंकून येईल, तो थोड्या मतांनी, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीपासून आधी तिसऱ्या क्रमांकावर  फेकले गेलेले आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेले चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नंतर मात्र जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

इम्तियाज जलील हे पत्रकारितेतून राजकारणात आलेले आहेत. २०१४ साली पहिल्यांदाच त्यांनी औरंगाबाद मध्यची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता त्यांनी पहिल्यांदाच खासदारकी लढवली आणि विजयी झाले. त्यांनी सांगितले की, औरंगाबादच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. कचऱ्याचे शहर ही औरंगाबादची प्रतिमा मला बदलायची आहे. मागच्या २०-२५ वर्षांपासून शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. आशिया खंडात सर्वाधिक प्रगतीचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा होती. सर्व नागरिकांना सोबत घेऊन मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचे व शहराला प्रगतिपथावर नेण्याचे काम मला करावयाचे आहे. 

आमदार म्हणून काम करताना जलील यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडले. शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यावर त्यांचा भर राहिला. आता त्यांना मनपाच्या कामांत लक्ष घालत इथले, औद्योगिकीकरण, बेरोजगारांचे प्रश्न, विमान, रेल्वेविषयक सुविधांमध्ये वाढ, समांतर जलवाहिनीचा अत्यंत गाजलेला प्रश्न यांना प्राधान्य द्यावयाचे आहे. 

५ कारणे विजयाची- दलित-मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ. - अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घडविले खैरेंच्या मताचे विभाजन.- ग्रामीण व शहरी  भागातील मतदानही काँग्रेसला मिळवता आले नाही.- शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध. चार टर्ममुळे आली अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी- शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Imtiaz Jalilइम्तियाज जलील