शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:08 IST

शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता.

ठळक मुद्दे चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

औरंगाबाद : ‘लोकांना बदल हवा होता’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता. क्षणाक्षणाला उत्सुकता ताणली जात होती. जो जिंकून येईल, तो थोड्या मतांनी, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीपासून आधी तिसऱ्या क्रमांकावर  फेकले गेलेले आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेले चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नंतर मात्र जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

इम्तियाज जलील हे पत्रकारितेतून राजकारणात आलेले आहेत. २०१४ साली पहिल्यांदाच त्यांनी औरंगाबाद मध्यची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता त्यांनी पहिल्यांदाच खासदारकी लढवली आणि विजयी झाले. त्यांनी सांगितले की, औरंगाबादच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. कचऱ्याचे शहर ही औरंगाबादची प्रतिमा मला बदलायची आहे. मागच्या २०-२५ वर्षांपासून शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. आशिया खंडात सर्वाधिक प्रगतीचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा होती. सर्व नागरिकांना सोबत घेऊन मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचे व शहराला प्रगतिपथावर नेण्याचे काम मला करावयाचे आहे. 

आमदार म्हणून काम करताना जलील यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडले. शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यावर त्यांचा भर राहिला. आता त्यांना मनपाच्या कामांत लक्ष घालत इथले, औद्योगिकीकरण, बेरोजगारांचे प्रश्न, विमान, रेल्वेविषयक सुविधांमध्ये वाढ, समांतर जलवाहिनीचा अत्यंत गाजलेला प्रश्न यांना प्राधान्य द्यावयाचे आहे. 

५ कारणे विजयाची- दलित-मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ. - अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घडविले खैरेंच्या मताचे विभाजन.- ग्रामीण व शहरी  भागातील मतदानही काँग्रेसला मिळवता आले नाही.- शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध. चार टर्ममुळे आली अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी- शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Imtiaz Jalilइम्तियाज जलील