शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे.

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे. अशा दलबदलूंचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखून आहे, अशी उपरोधिक टीका करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखून द्या, असे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ओम गार्डन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. खा. चव्हाण म्हणाले, जनतेत पत असेल तर मते पडतात. ज्यांची पतच नाही त्यांना मत कसे पडेल. अशांना जनतेनेच बाजूला केले. त्याला अशोकराव चव्हाण जबाबदार नाहीत. जे पक्ष सोडून गेले ते बरे झाले. नव्यांना संधी मिळेल. जे चांगले काम करतील ते पुढे येतील. ५० वर्षे मेहनत घेवून तयार केलेले घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. मतांची विभागणी करण्याची खेळी भाजपा-शिवसेनेकडून होत आहे. त्यातूनच वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे केले जातील. तोच उद्योग मला पराभूत करण्यासाठी केला होता. परंतु नांदेडच्या जनतेने विकासाच्या बाजुने कौल दिला. विधानसभा २००९ च्या विजयाची पुनरावृत्ती करा. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा राज्यात फडकला पाहिजे. त्याची सुरवात नांदेडमधून करा, असे आवाहन करीत खा. चव्हाण म्हणाले, अच्छे दिन कोणाचे आले, जनतेचे नव्हे त्यांचे आले. भाजपाकडून राजकीय दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याच पक्षातील लोकांवर बंधने लादली जात आहेत. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर किती गुन्हे दाखल आहेत हे आधी जनतेला सांगा, नंतर आमच्यावर आरोप करा. धर्मा-धर्मात, जाती-जातीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्ती करीत आहेत. शिर्डीचे साईबाबा देव नाहीत, असा ठराव विहिंपच्या धर्मसभेत ठराव घेण्यात आला. यातून हिंदू-हिंदुमध्ये भांडणे लावून देण्याचा उद्योग आहे. परंतु जनता हे उद्योग ओळखते. त्यांना महाराष्ट्रात योग्य धडा मिळेल आणि त्याची सुरूवात नांदेडमध्ये होईल, असा विश्वासही माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. एका विचाराने चाललो म्हणूनच विकासाची कामे दिसत आहेत. येणारा काळ सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा यांचीही भाषणे झाली. मंचावर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, मोतीराम पाटील, सभापती भुक्तरे, नगरसेवक विनय गिरडे पाटील, नवल पोकर्णा, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, मंगलताई निमकर, सुषमा गहेरवार, शमीम बेगम, विजय येवनकर, व्यंकट मुदिराज , संगीता पाटील डक, प्रफुल्ल सावंत आदींसह जि. प., पं. स. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)