शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

क्षेत्र नसलेल्यांनीही बोंडअळीचे अनुदान लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:36 IST

फुलंब्री तालुका : याद्या बनविताना घोळ; शेकडो शेतकऱ्यांवर अन्याय

रऊफ शेखफुलंब्री : तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीचे अनुदान देताना काही शेतकºयांना क्षेत्र वाढवून देण्याचा प्रकार घडला असून यामुळे खºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तुटपुंजा लाभ मिळालेल्या शेतकºयांनी केली आहे.फुलंब्री तालुक्यात २०१७ मध्ये शेतकºयांनी खरिपाच्या पेरणीत प्रथम प्राधान्य कपाशी पिकाला दिले होते. सुमारे ३५ हजार शेतकºयांनी २६ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी पिकाची लागवड केली. पण अचानक बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने निम्मी बोंडे खराब झाली. परिणामी कापसाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला. बोंडअळी नुकसानीबाबत भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांनी ओरड केली. यानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली. यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश होता.२१ कोटी २७ लाख रुपये मिळालेतालुक्यात ६१ हजार शेतकºयांना बोंडअळीच्या अनुदानापोटी शासनाकडून २१ कोटी २७ लाख रुपये मिळाले होते. हे अनुदान वाटप करताना तलाठीस्तरावर घोळ करण्यात आला. यामुळे खºया शेतकºयांना तुटपुंजे अनुदान मिळाले तर क्षेत्र नसलेल्यांना फुकटचे अनुदान मिळाले.केवळ २५ टक्केच मिळाले अनुदानशासनाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या कपाशी पिकाला अनुदान देताना हात आखडता घेतला. जे नुकसान झाले त्याच्या केवळ २५ टक्केच रक्कम अनुदानापोटी शेतकºयांना देण्यात आली. एका हेक्टरसाठी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे वाटप करण्यात आले. पण शेतकºयांना एका हेक्टरसाठी लागणारा खर्च सुमारे २८ ते ३० हजार रुपये येतो. असे असताना शासनाने केवळ द्यायचे म्हणून २५ टक्केच अनुदान दिल्याने शेतकºयांत नाराजी पसरली आहे.याद्या तयार करताना दलालाकडून चलाखीयाद्या तयार करताना मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. तलाठी सजांमध्ये असलेल्या दलालांनी याचा फायदा घेत आपल्या जवळच्या लोकांची नावे चुकीच्या पद्धतीने यादीत टाकली. ज्या शेतकºयांकडे कपाशीचे क्षेत्र जास्तीचे आहे, त्यांचे क्षेत्र कमी दाखविण्यात आले तर ज्या शेतकºयाच्या नावे कमी क्षेत्र आहे, त्या शेतकºयांचे क्षेत्र वाढवून दाखविले व अनुदान लाटण्यात आले. अनुदान वाटप करताना याद्या कोणी बनविल्या, याची चौकशी करुन झालेल्या घोळाला जबाबदार असणाºया लोकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी