शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

क्रेडिटवरील मालाचे ४५ दिवसांत पैसे द्या...; नव्या कायद्याची धास्ती, करोडोंच्या ऑर्डर रद्द

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 19, 2024 19:37 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापड व्यापाऱ्यांकडून १२५ कोटीच्या ऑर्डर रद्द

छत्रपती संभाजीनगर : जे व्यापारी एमएसएमई (सुक्ष्म, लघु, मध्यम) नोंदणीकृत उद्योगाकडून क्रेडिटवर माल खरेदी करतात. त्यांनी त्याचे पेमेंट ४५ दिवसांच्या आत केले नाही, तर क्रेडिटवर घेतलेला जेव्हा माल आहे तो त्या व्यापाऱ्याचे उत्पन्न गृहीत धरण्यात येईल व त्यावर आयकर विभाग ३० टक्के कर वसूल करेल. या नवीन कायद्यामुळे विशेषत: टेक्सटाइल उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील कापड व्यापाऱ्यांनी मागील १६ दिवसात सुमारे १०० कोटीच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत. तसेच ऑर्डर देऊन आलेला २५ कोटी माल संबंधित उद्योगांना पुन्हा परत पाठविला आहे, असे करणारे छत्रपती संभाजीनगरातीलच व्यापारी नसून संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांकडून ऑर्डर रद्द केल्या जात आहेत. यामुळे टेक्सटाइल उद्योग अडचणीत आला आहे, असे सुत्रांनी सांगितले. शहरात बंगळुरू, सुरत, कोलकाता येथून प्रामुख्याने कापड माल येतो.

कायदा काय म्हणतो ?केंद्र सरकारने २०२३च्या अर्थसंकल्पात आयकर कलम ४३ (बी) मध्ये संशोधन करून त्यात कलम (एच) जोडण्यात आले. याअंतर्गत एमएसएमईला वेळेवर त्यांचे पेमेंट मिळावे, असा आहे. उत्पादक असो वा वितरक, त्यांना व्यापाऱ्यांकडून वेळेवर पेमेंट मिळाले नाही तर त्यांच्या अर्थचक्राची गती कमी होते. माल क्रेडिटवर घेतल्यावर नवीन कायद्यांतर्गत ४५ दिवसांच्या आत त्याचे एमएसएमईला पेमेंट करणे सक्तीचे झाले आहे.

पेमेंट न केल्यास काय होईल परिणाम ?व्यापाऱ्याने एमएसएमईकडून क्रेडिटवर माल खरेदी केला व त्याचे पेमेंट ४५ दिवसात केले नाही तर जेवढा माल क्रेडिटवर व्यापाऱ्याने घेतला, तो सर्व माल उत्पन्न समजून त्यावर आयकर विभाग ३० टक्के आयकर लावणार आहे. तो संबंधित व्यापाऱ्यांना भरावा लागणार आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

कापड व्यापाऱ्यांनी ऑर्डर रद्द का केल्या ?टेक्सटाइल क्षेत्रात एमएसएमईकडून व्यापारी कापड, रेडिमेड कपडे, साड्या आदी वस्त्र क्रेडिटवर खरेदी करत असतात. त्याचे पेमेंट कमीत कमी ९० दिवसात किंवा अधिक काळात देण्याची सवलत एमएसएमई देत असते. तसा करार असतो. मात्र, आता ४५ दिवसांत पेमेंट करण्याचा कायदा आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुमारे १२५ कोटीच्या ऑर्डर रद्द केल्या आहेत.-विनोद लोया, अध्यक्ष, कापड व्यापारी संघटना

कायद्याची अंमलबजावणी वर्षभरासाठी स्थगित कराकॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापारी संघटनेच्या शिखर संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल व शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. हा नवीन कायदा एमएसएमईच्या हिताचा असला तरी त्यासंदर्भात जनजागृती नसल्याने वर्षभर व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करून १ एप्रिल २०२५पासून त्याची अंमलबजावणी करावी. तोपर्यंत कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे निवेदन त्यांनी दिले.-अजय शहा, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष, कॅट

नवीन कायद्याबाबत जनजागृती करणे आवश्यकआयकर कलम ४३ (बी) एच या कायद्यातील नवीन संशोधनाविषयीची माहिती अनेक व्यापाऱ्यांना नाही. पुढील वर्षभर त्यासंदर्भात कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करून व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. एमएसएमईसाठी हा कायदा मोठा फायदेशीर आहे. त्याचे स्वागत करतो. पण, यात संभ्रमही आहेत. ते स्पष्ट होणे अपेक्षित आहेत.-संतोष कावले - पाटील, अध्यक्ष, कॅट, स्थानिक शाखा

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय