शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोनशे वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव !

By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST

उस्मानाबाद : सन २००१ च्या लोकसंख्येनुसार नगर परिषदेअंतर्गत कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मागील काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे

उस्मानाबाद : सन २००१ च्या लोकसंख्येनुसार नगर परिषदेअंतर्गत कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मागील काही वर्षांमध्ये शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. हा प्रश्न लक्षात घेवून पालिकेकडून सध्याची लोकसंख्या लक्षात घेवून कर्मचारी आकृतीबंध तयार केला आहे. त्यानुसार तब्बल १८६ वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला आहे.नगर परिषदेचा सध्याचा कर्मचारी आकृतीबंध हा २००५ मध्ये तयार करण्यात आलेला होता. तेव्हा २००१ ची जनगणना विचारात घेवून १३८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, मागील दशकभरात शहराचा विस्तार प्रचंड गतीने झाला आहे. असे असतानाच २००८ मध्ये पालिकेची हद्दवाढ झाली. त्यामुळे शहराचा विस्तार १२ वरून ४६ चौरस किलोमिटर इतका झाला. तसेच लोकसंख्याही १ लाख २५ हजारावर जावून ठेपली. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ लक्षात घेवून नगर परिषदेच्या वतीने २००७-२००८ मध्ये वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यात आली. जवळपास ११० किमी अंतरावरून ही योजना राबविण्यात आली आहे. परंतु, कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे पाईपलाईन दुरूस्तीच्या कामांसोबतच सुरळीत पाणीपुरवठा करण्यातही अडचणी येत आहेत.दरम्यान, हीच अवस्था स्वच्छता विभागाची आहे. एकीकडे शहराचा विस्तार होत असला तरी कर्मचाऱ्यांची संख्या मात्र, वाढलेली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सध्या शहराची साफसफाई सुरू आहे. बांधकाम, वीज विभागातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. एखाद्या वॉर्डातील साधा विद्युत बल्बही बंद पडला तरी तो बदलण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतात. बांधकाम विभागातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. ही सर्व अडचण दहा वर्षांपूर्वीच्या कर्मचारी आकृतीबंधामुळे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार पालिकेला १८६ वाढीव कर्मचाऱ्यांची गरज आहे. हा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाला सादर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)सुधारित आकृतीबंधानुसार आस्थापना विभागामध्ये १९, सभा कामकाजासाठी ०५, नगर रचना विभागासाठी ०४, लेखा परीक्षण विभागसाठी ०४, शहर विकास विभागासाठी ०४, पाणीपुरवठा विभागात २६, आरोग्य विभागासाठी १२१, जन्म-मृत्यू नोंदणी विभागासाठी ०६, शिक्षण विभागात ०४, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १३, कर वसुलीसाठी १६, दारिद्र्य निर्मुलन कक्षासाठी ०४, दिवाबत्तीसाठी ०८, अभिलेख कक्षासाठी ०३, माहिती अधिकार अपिलासाठी ०३, उद्यान परिवेक्षक विभागासाठी ३०, अग्निशमन विभागासाठी २१, जनसंपर्क अधिकारी तथा कायदेशिर सल्लागार म्हणून २, संगणक विभागासाठी १०, भांडार विभागाकरिता ०३, अतिक्रमण विभागासाठी ०६, ग्रंथालयासाठी ०२ आणि लेखा विभागासाठी ०९ असे एकूण ३२४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. यापैकी सध्या अवघे १३८ कर्मचारी उपलब्ध आहेत.