शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

‘ई-पॉस’ योजनेला ‘पॉझ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:00 IST

मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आॅक्टोबर महिन्याअखेर १६ हजार १८१ पैकी १३ हजार ८४९ रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या. यापैकी २ हजार ४४४ मशीन बंद असून, उर्वरित ११ हजार ४०५ मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येते.विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ रेशनकार्डधारक असून, यापैकी आॅक्टोबर महिन्यात २२ लाख ३३ हजार ३०४ कार्डधारकांनाच ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात आले. विभागात सर्वत्र ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत धान्य वाटप झाल्याचा दावा प्रशासन करते.विभागात अद्याप १७ लाख कार्डधारकांना जुन्याच पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते, मग ई-पॉस मशीनचा उपयोग काय, असा प्रश्न पुढे येतो आहे. फेब्रुवारी महिन्यात रेशन दुकानांवर ई-पॉस मशीन बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात लातूर व नांदेड, दुसºया टप्प्यात जालना, उस्मानाबाद व हिंगोली व तिसºया व अंतिम टप्प्यामध्ये औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सर्व रेशन दुकानांवर या मशीन बसविण्यात आल्या होत्या.