शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘ई-पॉस’ योजनेला ‘पॉझ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:00 IST

मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आॅक्टोबर महिन्याअखेर १६ हजार १८१ पैकी १३ हजार ८४९ रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या. यापैकी २ हजार ४४४ मशीन बंद असून, उर्वरित ११ हजार ४०५ मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येते.विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ रेशनकार्डधारक असून, यापैकी आॅक्टोबर महिन्यात २२ लाख ३३ हजार ३०४ कार्डधारकांनाच ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात आले. विभागात सर्वत्र ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत धान्य वाटप झाल्याचा दावा प्रशासन करते.विभागात अद्याप १७ लाख कार्डधारकांना जुन्याच पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते, मग ई-पॉस मशीनचा उपयोग काय, असा प्रश्न पुढे येतो आहे. फेब्रुवारी महिन्यात रेशन दुकानांवर ई-पॉस मशीन बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात लातूर व नांदेड, दुसºया टप्प्यात जालना, उस्मानाबाद व हिंगोली व तिसºया व अंतिम टप्प्यामध्ये औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सर्व रेशन दुकानांवर या मशीन बसविण्यात आल्या होत्या.