शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: June 22, 2014 00:10 IST

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस रक्ताची मोठी गरज भासते आहे. विशेषत: घातपात, अपघात, गंभीर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांना वेगवेगळ्या रक्तगटाच्या पिशव्यांची मोठी गरज निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक दवाखान्यातील खर्चांसह औषधोपचारामुळे आर्थिक विवंचनेत सापडत असताना आता रक्त व रक्त घटकांतील सेवाशुल्कातील अडीचपट वाढ या रुग्णांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड देणारी बाब ठरणार आहे. राष्ट्रीय रक्त धोरण व्यवस्थितरीत्या राबविण्याच्या दृष्टीने रक्त व रक्तघटकांवरील सेवाशुल्क सुधारित करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. रक्त व रक्तघटकांची प्रक्रिया, चााचणी शुल्क सुधाीरत व्हावेत यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने रेड क्रॉस, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवाशुक्लाचा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेस पाठविण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दिवसाला चाळीस तर वर्षाला तब्बल बारा हजार रक्तपिशव्यांची गरज भासत आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसह जनकल्याण रक्तपेढीवरच रूग्णांसह कुटुंबियांची दारोमदार अवलंबून आहे. या दोन्ही रक्तपेढ्या ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करीत आल्या आहेत. आता सरकारच्या अडीच पट वाढीच्या निर्णयाचा तडाखा रुग्णांसह कुटुंबियांना बसणार, हे स्पष्ट आहे. रक्तपेढ्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे. मुळात रक्तपेढ्या चालविणेच मोठे आव्हान ठरले आहे. परंतु विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या भक्कम सहकार्याने या रक्तपेढ्या अविरत सेवा देत आल्या आहेत. (प्रतिनिधी)