शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

रुग्णांना सोसावा लागणार आर्थिक भुर्दंड

By admin | Updated: June 22, 2014 00:10 IST

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

जालना : रक्त, रक्तघटकांच्या सेवाशुल्कात राज्य सरकारने सुमारे अडीचपट वाढ केल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णाांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. दिवसेंदिवस रक्ताची मोठी गरज भासते आहे. विशेषत: घातपात, अपघात, गंभीर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांना वेगवेगळ्या रक्तगटाच्या पिशव्यांची मोठी गरज निर्माण होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे नातेवाईक दवाखान्यातील खर्चांसह औषधोपचारामुळे आर्थिक विवंचनेत सापडत असताना आता रक्त व रक्त घटकांतील सेवाशुल्कातील अडीचपट वाढ या रुग्णांसह कुटुंबियांना मोठा आर्थिक भुर्दंड देणारी बाब ठरणार आहे. राष्ट्रीय रक्त धोरण व्यवस्थितरीत्या राबविण्याच्या दृष्टीने रक्त व रक्तघटकांवरील सेवाशुल्क सुधारित करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. रक्त व रक्तघटकांची प्रक्रिया, चााचणी शुल्क सुधाीरत व्हावेत यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने रेड क्रॉस, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवाशुक्लाचा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेस पाठविण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दिवसाला चाळीस तर वर्षाला तब्बल बारा हजार रक्तपिशव्यांची गरज भासत आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीसह जनकल्याण रक्तपेढीवरच रूग्णांसह कुटुंबियांची दारोमदार अवलंबून आहे. या दोन्ही रक्तपेढ्या ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करीत आल्या आहेत. आता सरकारच्या अडीच पट वाढीच्या निर्णयाचा तडाखा रुग्णांसह कुटुंबियांना बसणार, हे स्पष्ट आहे. रक्तपेढ्यांनासुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे. मुळात रक्तपेढ्या चालविणेच मोठे आव्हान ठरले आहे. परंतु विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या भक्कम सहकार्याने या रक्तपेढ्या अविरत सेवा देत आल्या आहेत. (प्रतिनिधी)