शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची हेटाळणी !

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी

सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी त्यांना अरेरावीची भाषा करीत आहेत. त्यांच्याबद्दल तक्रारी देण्यास प्रवाशांचीही उदासिनता आहे़ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यास वेळ नाही़ बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून महामंडळातील वाहतूक नियंत्रकांकडून प्रवाशांची हेटाळणी होत असल्याची माहिती समोर आली आहे.‘प्रवासी हेच आमचे दैवत. आम्ही सौजन्यशील आहोत, प्रवाशांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. आम्ही आमचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवू.’ हे वाक्य ऐकून कोणालाही महामंडळाच्या कामावर संशय येणार नाही. मात्र प्रत्यक्षात या वाक्याचा कुठलाच प्रत्यय जिल्ह्यातील बसस्थानकामध्ये आढळून येत नाही. बसस्थानकातील वाहतूक कक्षांची पाहणी करण्यात आली. वाहतूक नियंत्रकाकडून प्रवाशांना अपेक्षित माहिती दिली जाते का? प्रवासी वाहतूक नियंत्रकांकडे शांतपणे माहिती विचारतात का? त्यातून समाधान होते का? माहिती न मिळाल्यास प्रवासी तक्रार करतात का? प्रवासी त्यांच्याशी हुज्जत घालतात का? यासारखे विविध प्रश्न घेऊन १०० प्रवाशांना विचारण्यात आले. यातून महामंडळाबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप असल्याचे समोर आले.६० टक्के लोक आजही बसनेच प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास सर्वसामान्य प्रवासी अधिक पसंती देत आहेत. निम्म्याहून अधिक प्रवासी वाहतूक नियंत्रकाकडे जावून बसबद्दल माहिती विचारतात. ४० टक्के लोकांचे म्हणणे आहे की आम्हाला माहिती दिली जात नाही तर तेवढ्याच प्रवाशांचे म्हणणे आहे की कधीतरी माहिती दिली जाते. माहिती विचारल्यावर प्रवाशांवर चिडचिड होत असून वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्र्रवाशांचीही तक्रारी देण्यास उदासीनता असून दिलेल्या तक्रारींचे निरसणच होत नसल्याचे ८० टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे.प्रभारी आगारप्रमुख भूसारी यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी माझ्याकडे तक्रारी आल्या की शहानिशा करून थेट कारवाई करतो. प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू. तक्रार द्या, थेट कारवाई करतो. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगितले.आपण बसने प्रवास करता का ?२़आठवड्यातून किती वेळा बसने प्रवास करता ?३़वाहतूक नियंत्रकाकडे चौकशीसाठी आपण जाता का ?४़आपण त्यांना व्यवस्थीत माहिती विचारता का ?५़वाहतूक निंयत्रक आपल्याला अपेक्षीत माहिती देतातका ?६़ वाहतूक नियंत्रक आपल्यावर चिडचिड करतात का ?७़माहिती न दिल्यास आपण काय करता ?८़वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे असे आपणाला वाटते का ?९़तक्रारीचे निरसण होते का ?१०़ बसमध्ये पुरेशा सुविधा मिळतात का ?ा्रत्येक बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक तक्रार पेटी असते. मात्र कुठल्याच स्थानकात या पेट्या नाहीत. याची ना अधिकाऱ्यांना काळजी आहे ना प्रवाशांना. प्रवाशीही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत.वाहतूक नियंत्रक कक्षात बसगाड्यांची चौकशी करण्यासाठी येणारे हे जास्तीत जास्त असुशिक्षीत आणि ग्रामीण भागातील असतात. या लोकांना नियमांची माहिती नसते. त्यांना योग्य माहिती देऊन आपले कर्तव्य बजवावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.