शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

प्रवाशांची हेटाळणी !

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी

सोमनाथ खताळ , बीडजिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी त्यांना अरेरावीची भाषा करीत आहेत. त्यांच्याबद्दल तक्रारी देण्यास प्रवाशांचीही उदासिनता आहे़ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यास वेळ नाही़ बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून महामंडळातील वाहतूक नियंत्रकांकडून प्रवाशांची हेटाळणी होत असल्याची माहिती समोर आली आहे.‘प्रवासी हेच आमचे दैवत. आम्ही सौजन्यशील आहोत, प्रवाशांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. आम्ही आमचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवू.’ हे वाक्य ऐकून कोणालाही महामंडळाच्या कामावर संशय येणार नाही. मात्र प्रत्यक्षात या वाक्याचा कुठलाच प्रत्यय जिल्ह्यातील बसस्थानकामध्ये आढळून येत नाही. बसस्थानकातील वाहतूक कक्षांची पाहणी करण्यात आली. वाहतूक नियंत्रकाकडून प्रवाशांना अपेक्षित माहिती दिली जाते का? प्रवासी वाहतूक नियंत्रकांकडे शांतपणे माहिती विचारतात का? त्यातून समाधान होते का? माहिती न मिळाल्यास प्रवासी तक्रार करतात का? प्रवासी त्यांच्याशी हुज्जत घालतात का? यासारखे विविध प्रश्न घेऊन १०० प्रवाशांना विचारण्यात आले. यातून महामंडळाबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप असल्याचे समोर आले.६० टक्के लोक आजही बसनेच प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास सर्वसामान्य प्रवासी अधिक पसंती देत आहेत. निम्म्याहून अधिक प्रवासी वाहतूक नियंत्रकाकडे जावून बसबद्दल माहिती विचारतात. ४० टक्के लोकांचे म्हणणे आहे की आम्हाला माहिती दिली जात नाही तर तेवढ्याच प्रवाशांचे म्हणणे आहे की कधीतरी माहिती दिली जाते. माहिती विचारल्यावर प्रवाशांवर चिडचिड होत असून वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्र्रवाशांचीही तक्रारी देण्यास उदासीनता असून दिलेल्या तक्रारींचे निरसणच होत नसल्याचे ८० टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे.प्रभारी आगारप्रमुख भूसारी यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी माझ्याकडे तक्रारी आल्या की शहानिशा करून थेट कारवाई करतो. प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू. तक्रार द्या, थेट कारवाई करतो. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगितले.आपण बसने प्रवास करता का ?२़आठवड्यातून किती वेळा बसने प्रवास करता ?३़वाहतूक नियंत्रकाकडे चौकशीसाठी आपण जाता का ?४़आपण त्यांना व्यवस्थीत माहिती विचारता का ?५़वाहतूक निंयत्रक आपल्याला अपेक्षीत माहिती देतातका ?६़ वाहतूक नियंत्रक आपल्यावर चिडचिड करतात का ?७़माहिती न दिल्यास आपण काय करता ?८़वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे असे आपणाला वाटते का ?९़तक्रारीचे निरसण होते का ?१०़ बसमध्ये पुरेशा सुविधा मिळतात का ?ा्रत्येक बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक तक्रार पेटी असते. मात्र कुठल्याच स्थानकात या पेट्या नाहीत. याची ना अधिकाऱ्यांना काळजी आहे ना प्रवाशांना. प्रवाशीही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत.वाहतूक नियंत्रक कक्षात बसगाड्यांची चौकशी करण्यासाठी येणारे हे जास्तीत जास्त असुशिक्षीत आणि ग्रामीण भागातील असतात. या लोकांना नियमांची माहिती नसते. त्यांना योग्य माहिती देऊन आपले कर्तव्य बजवावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.