शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अंशतः लाॅकलाडऊन : अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा; दहावी-बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांतून चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 13:30 IST

Partly Lockdown in Aurangabad ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे.

ठळक मुद्देअभ्यासक्रम, प्रात्यक्षिकाचे कसे होणार, हा प्रश्न अनुत्तरितच

औरंगाबाद : जिल्ह्यात दि. ११ मार्च ते दि.४ एप्रिलपर्यंत अंशतः लाॅकलाडऊन घोषित केल्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा आलेल्या असताना विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना आता अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक पूर्ण कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३ नोव्हेंबरला तर शहरात ४ जानेवारीपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक अडचणींमुळे ३० ते ४० टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकले. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या शंकांच्या समाधानावर भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मात्र, प्रत्यक्ष वर्ग बंद होणार असल्याने पुन्हा त्याच तांत्रिक अडचणी, परीक्षा दिवसागणिक जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतून परीक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होईलपरीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असल्याने मार्च आणि एप्रिलच्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी मिळाले होते. सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून हे प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. ते सुरू ठेवायला हवे होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

ऑनलाइन सुरू राहीलजिल्हाधिकारी महोदयांशी बोलणे झाले, त्यानुसार केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. शाळा, शिकवण्या, क्लासेस यांना प्रतिबंध आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्गही बंद राहतील. त्यामुळे दहावी, बारावीचा अभ्यासही ऑनलाइनच सुरू राहील.-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

दहावीचे विद्यार्थी ६५,०११बारावीचे विद्यार्थी ५५,१७७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद