शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

अंशतः लाॅकलाडऊन : अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा; दहावी-बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांतून चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 13:30 IST

Partly Lockdown in Aurangabad ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे.

ठळक मुद्देअभ्यासक्रम, प्रात्यक्षिकाचे कसे होणार, हा प्रश्न अनुत्तरितच

औरंगाबाद : जिल्ह्यात दि. ११ मार्च ते दि.४ एप्रिलपर्यंत अंशतः लाॅकलाडऊन घोषित केल्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा आलेल्या असताना विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना आता अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक पूर्ण कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३ नोव्हेंबरला तर शहरात ४ जानेवारीपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक अडचणींमुळे ३० ते ४० टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकले. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या शंकांच्या समाधानावर भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मात्र, प्रत्यक्ष वर्ग बंद होणार असल्याने पुन्हा त्याच तांत्रिक अडचणी, परीक्षा दिवसागणिक जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतून परीक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होईलपरीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असल्याने मार्च आणि एप्रिलच्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी मिळाले होते. सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून हे प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. ते सुरू ठेवायला हवे होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

ऑनलाइन सुरू राहीलजिल्हाधिकारी महोदयांशी बोलणे झाले, त्यानुसार केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. शाळा, शिकवण्या, क्लासेस यांना प्रतिबंध आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्गही बंद राहतील. त्यामुळे दहावी, बारावीचा अभ्यासही ऑनलाइनच सुरू राहील.-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

दहावीचे विद्यार्थी ६५,०११बारावीचे विद्यार्थी ५५,१७७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद