शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पक्षांना मतविभाजनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे़ ८१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५८१ उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे, प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़मागील १९ वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे़ या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे़ तर केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा लाभ उठवित नांदेडचा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजपाने आखले आहेत़राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक तशी अस्तित्वाचीच आहे़ या दोन्ही पक्षांचा भर मागील निवडणुकीत असलेले बलाबल टिकविण्याकडे असणार आहे़ चारही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत़त्यातच २५३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ काँग्रेस सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवित असून काँग्रेसपाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार आहेत़ भाजपाने सर्व ८१ जागांवर उमेदवार दिले होते़, परंतु अर्जाच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने आता ८० जागांवरच भाजपाला आपले बळ आजमावावे लागणार आहे़ भाजपापाठोपाठ शिवसेना ७१ जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे़विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवार दिले होते़ सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी ५५ जागांवर नशीब आजमावत आहे़अनेक प्रभागांत राष्ट्रवादीला यंदा उमेदवार मिळाले नाहीत़ एआयएमआयएमने मागील वर्षी ११ जागांवर विजय खेचत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती़ एआयएमआयएमच्या या कामगिरीची राज्यभरात चर्चाही झाली़ मात्र मध्यंतरीच्या काळात एमआयएमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वळचणीला जाणे पसंत केल्याने या पक्षाने यावेळी बसपासोबत आघाडी करीत केवळ ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत़ बसपा १७ जागांवर निवडणूक लढवित आहे़एकूणच प्रमुख पक्षांचा एकला चलो रे चा नारा आणि त्यातच अपक्षांची पडलेली भर यामुळे बहुतांश प्रभागांत चुरस अनुभवण्यास मिळत आहे़ कोण किती मते खेचतो याबरोबरच कोण कोणाची मते वजा करतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़