शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

पक्षांना मतविभाजनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे़ ८१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५८१ उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे, प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़मागील १९ वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे़ या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे़ तर केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा लाभ उठवित नांदेडचा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजपाने आखले आहेत़राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक तशी अस्तित्वाचीच आहे़ या दोन्ही पक्षांचा भर मागील निवडणुकीत असलेले बलाबल टिकविण्याकडे असणार आहे़ चारही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत़त्यातच २५३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ काँग्रेस सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवित असून काँग्रेसपाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार आहेत़ भाजपाने सर्व ८१ जागांवर उमेदवार दिले होते़, परंतु अर्जाच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने आता ८० जागांवरच भाजपाला आपले बळ आजमावावे लागणार आहे़ भाजपापाठोपाठ शिवसेना ७१ जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे़विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवार दिले होते़ सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी ५५ जागांवर नशीब आजमावत आहे़अनेक प्रभागांत राष्ट्रवादीला यंदा उमेदवार मिळाले नाहीत़ एआयएमआयएमने मागील वर्षी ११ जागांवर विजय खेचत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती़ एआयएमआयएमच्या या कामगिरीची राज्यभरात चर्चाही झाली़ मात्र मध्यंतरीच्या काळात एमआयएमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वळचणीला जाणे पसंत केल्याने या पक्षाने यावेळी बसपासोबत आघाडी करीत केवळ ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत़ बसपा १७ जागांवर निवडणूक लढवित आहे़एकूणच प्रमुख पक्षांचा एकला चलो रे चा नारा आणि त्यातच अपक्षांची पडलेली भर यामुळे बहुतांश प्रभागांत चुरस अनुभवण्यास मिळत आहे़ कोण किती मते खेचतो याबरोबरच कोण कोणाची मते वजा करतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़