शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पक्षांना मतविभाजनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे़ ८१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५८१ उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे, प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़मागील १९ वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे़ या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे़ तर केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा लाभ उठवित नांदेडचा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजपाने आखले आहेत़राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक तशी अस्तित्वाचीच आहे़ या दोन्ही पक्षांचा भर मागील निवडणुकीत असलेले बलाबल टिकविण्याकडे असणार आहे़ चारही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत़त्यातच २५३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ काँग्रेस सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवित असून काँग्रेसपाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार आहेत़ भाजपाने सर्व ८१ जागांवर उमेदवार दिले होते़, परंतु अर्जाच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने आता ८० जागांवरच भाजपाला आपले बळ आजमावावे लागणार आहे़ भाजपापाठोपाठ शिवसेना ७१ जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे़विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवार दिले होते़ सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी ५५ जागांवर नशीब आजमावत आहे़अनेक प्रभागांत राष्ट्रवादीला यंदा उमेदवार मिळाले नाहीत़ एआयएमआयएमने मागील वर्षी ११ जागांवर विजय खेचत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती़ एआयएमआयएमच्या या कामगिरीची राज्यभरात चर्चाही झाली़ मात्र मध्यंतरीच्या काळात एमआयएमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वळचणीला जाणे पसंत केल्याने या पक्षाने यावेळी बसपासोबत आघाडी करीत केवळ ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत़ बसपा १७ जागांवर निवडणूक लढवित आहे़एकूणच प्रमुख पक्षांचा एकला चलो रे चा नारा आणि त्यातच अपक्षांची पडलेली भर यामुळे बहुतांश प्रभागांत चुरस अनुभवण्यास मिळत आहे़ कोण किती मते खेचतो याबरोबरच कोण कोणाची मते वजा करतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़