शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाईत ८० हजार बैलजोड्यांचा सहभाग

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्यात मंगळवारी दिवसभरात ७० ते ८० हजार बैलजोड्या दाखल झाल्या.

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्यात मंगळवारी दिवसभरात ७० ते ८० हजार बैलजोड्या दाखल झाल्या. विदर्भासह संपूर्ण मराठवाड्यातून आपल्या बैलांना गोरखनाथाचे दर्शन घडविण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळवण्यात आली होती. पशुवैद्यकीय विभागांच्या वतीने बैलांच्या मोफत तपासणी व लसीकरणासाठी शिबीर घेण्यात आले. उद्घाटन सरपंच दुलबाराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष साहेबराव कदम, सचिव बाबुराव कदम, माजी सरपंच गुलाबराव कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष बालाजी मगर, गोविंदराव मगर, रावसाहेब निर्मल, माणिकराव कदम, सुलभाजी बोडखे, साहेबराव कुंभार, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. मुस्तरे, डॉ. गड्डमवार, डॉ. झडते, डॉ. मुटकुळे, डॉ. गानमोटे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. पूद्दलवार आदी उपस्थित होते. यामध्ये जवळपास ५०० बैलांना घटसर्प व फऱ्या रोगाची संयुक्त लस देण्यात आली. तसेच १२५-१५० बैलांवर औषधोपचार करण्यात आले. पाणीटंचाई असल्यामुळे दरवर्षी मारोतराव वसमतकर, उत्तम भोसले, अंबादासराव भोसले यांनी विनामुल्य टँकरने पाणीपुरवठा करत असतात. यात्रा कमेटीच्या वतीने २५ क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी पोनि नानासाहेब नागदरे, फौजदार कदम, फौजदार जोंधळे यांच्यासह ७० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)केसापुरातही उत्साहहिंगोली : हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील केशवराज महाराज मंदिरासमोर पोळा उत्साहात साजरा झाला. बैल एकाच तोरणाखाली उभे करून पूजा करण्यात आली. यावेळी गणेश शिंदे, परसराम शिंदे, श्रीराम शिंदे, भानुदास शिंदे, शामराव शिंदे, विठ्ठल शिंदे, किसन शिंदे, नामदेव शिंदे, रामेश्वर शिंदे, प्रल्हाद शिंदे, सरपंच केशव शिंदे, शंकर शिंदे, देविदास महाराज टेकाळे, संतोष टेकाळे, किसन टेकाळे उपस्थित होते.पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या करीला महापोळा म्हणजेच बैलाची यात्रा भरते. दर्शनासाठी मराठवाड्याच्या विविध भागातून बैलजोड्या येतात. पोळा आटोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शेतकरी आपापल्या बैलजोड्या घेऊन वाईकडे प्रयाण करतात. दरवर्षी किमान हजारो बैलजोड्या येथे दाखल होतात. गोरखनाथाचे दर्शन घेतल्याने वर्षभर ठणठणीत राहतात, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ वसमत तालुक्यातच ही ऐतिहासिक बैलांची यात्रा (महापोळा उत्सव) भरविली जाते. ग्रामस्थांच्या वतीने यात्रा समिती स्थापन केली जाते. हा उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदार या समितीची असते.