शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

औरंगाबाद जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’कडे पालकांची पाठ; वर्षभरात अवघ्या आठ जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:45 IST

दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत.

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत. तथापि, गेल्या महिन्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन एक किंवा दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणा-या पालकांचा शोध घेतला. त्यांना भेटून या योजनेबाबत समुपदेशन केले. तेव्हा कुठे दोन वर्षांत अवघी ८ कुटुंबे तयार झाली व त्यांना जि.प. महिला व बालकल्याण विभागाने या योजनेचा लाभ दिला. 

प्रामुख्याने मुलींचे शिक्षण व आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘सुकन्या’ योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिल २०१६ पासून ‘सुकन्या’ योजनेचे ‘माझी कन्या भाग्यश्री’ या नव्या योजनेत विलीनीकरण करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू झाल्यापासून तब्बल दीड वर्षे या योजनेला समाजातून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने १ आॅगस्ट २०१७ रोजी या योजनेचे निकष शिथिल केले. 

पूर्वीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. सुधारित योजनेत दारिद्र्यरेषेची अट काढून टाकण्यात आली असून, उत्पन्न मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. एका मुलीनंतर आई किंवा वडिलाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार, तर दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल, तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. या ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल. 

स्वातंत्र्यदिनी जाणार घरोघरीयासंदर्भात जि.प.चे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त आहे. मुलांएवढेच मुलींवर प्रेम करणारे अनेक आहेत. मुलीच्या जन्मानंतर पाळणा थांबविणारेही अनेक आहेत; पण समाजामध्ये एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता फारसी रुजलेली नाही. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी हे घरोघरी जाऊन योजनेची माहिती देतील. प्रामुख्याने एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार