शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

समांतरच्या अधिकाऱ्यावर हल्ला

By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीतील लेखाधिकारी अनिल गोयल यांच्यावर मंगळवारी सायंकाळी कार्यालयात प्राणघातक हल्ला करण्यात आला

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीतील लेखाधिकारी अनिल गोयल यांच्यावर मंगळवारी सायंकाळी कार्यालयात प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी मागील दोन वर्षांपासून शहरात काम करीत आहे. कंपनीने ११५ वॉर्डांमध्ये कामे करण्यासाठी ८९ छोटे-छोटे कंत्राटदार नेमले आहेत. दरमहिना कंत्राटदारांना सुमारे ३ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात येतात. सध्या कंपनीकडे ४० ते ४५ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीसोबत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी बिले द्यावीत म्हणून तगादा लावला आहे. मंगळवारी सायंकाळी कंपनीतील लेखाधिकारी अनिल गोयल नेहमीप्रमाणे काम करीत असताना एक कंत्राटदार त्यांच्याकडे आला. त्याने गोयल यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. कंत्राटदाराने लोखंडी रॉड गोयल यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यांना त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गोयल यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, कंपनीतील सूत्रांनी सांगितले की, आम्ही कोणाचेही पैसे बुडविणार नाही. उलट मनपाने आम्हाला एक संधी द्यावी चांगले काम करून दाखवू असे म्हटले आहे. वैयक्तिक हल्ले करणे कितपत योग्य आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.मनपाकडून ताबा घेण्याची तयारीमंगळवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मनपाला आपले उत्तर दिले. २२ पानांच्या उत्तरात कंपनीने म्हटले आहे की, आमच्यावरील आरोपांचे आम्ही यापूर्वीच खंडन केले आहे. मनपाला करारात अनेक त्रुटी आहे असे वाटत असेल तर मनपाने करारात दुरुस्ती करावी. मनपाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील. मनपाने कंपनीला काम करण्याची संधी द्यावी असेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कंपनीने आम्हाला उत्तर दिले आहे.आम्ही नोटीसचा अभ्यास करण्यासाठी विधि आणि तांत्रिक विभागाची मदत घेणे सुरू केले आहे. या दोन विभागांचा अभिप्राय आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. पाणीपुरवठा ताब्यात घेण्यासाठी लागणारी सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. \औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मनपाला दिलेल्या २२ पानांच्या उत्तरात असंख्य आरोप केले आहेत. मनपाने करार रद्द करण्याची दिलेली नोटीस चुकीची आणि राजकीय दबावाखाली दिली आहे. याशिवाय मनपाकडून वेळोवेळी सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या नोटीसचा काही अंश.४लवादाची स्थापना करावी असे पत्र लवकरच मनपाला देण्यात येईल. कंपनीने लवादावरील आपल्या प्रतिनिधीचे नाव निश्चित केले आहे. मनपानेही त्यांच्या प्रतिनिधीचे नाव लवकर निवडावे. तिसरा प्रतिनिधीही निवडण्यात यावा.४समांतरचा करार झाल्यानंतर कंपनीने मनपाला प्रकल्प आराखडा सादर केला. त्यात वेळोवेळी बदल करण्यात वेळ वाया घालविण्यात आला. त्याचा परिणाम हायड्रोलिक मॉडेलवर झाला.