शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

समांतर प्रकरणात महापौर, आयुक्तांची भूमिका संशयास्पद; पालकमंत्र्यांचा खैरेंच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 17:26 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर गटांगळ्या खाणार्‍या वादग्रस्त अशा समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी महापौर नंदकुमार घोडेले, पालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचा शब्दहल्ला करून खा. चंद्रकांत खैरे यांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात खा. खैरे यांनी जिल्हा व दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकीत समांतर जलवाहिनी योजनेची शहराला किती गरज आहे, यावर प्रकाश टाकत मनपाच्या यंत्रणेवर खापर फोडले होते. त्यावर पालकमंत्र्यांनी सोमवारी जिल्हा व नियोजन समितीच्या बैठकीत महापौर व आयुक्तांना टीकेचे लक्ष्य करून योजनेच्या विरोधाचा बार उडविला.

औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर गटांगळ्या खाणार्‍या वादग्रस्त अशा समांतर जलवाहिनीच्या योजनेवरून सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी महापौर नंदकुमार घोडेले, पालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची भूमिका संशयास्पद असल्याचा शब्दहल्ला करून खा. चंद्रकांत खैरे यांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला. पूर्वीचे आयुक्त योजनेच्या विरोधात बोलायचे, तुम्ही बोलत नाहीत, असा इशारा आयुक्तांकडे बोट करीत पालकमंत्र्यांनी समांतर योजना प्रकरण संशयास्पद असल्याचा ठपका ठेवला. 

गेल्या आठवड्यात खा. खैरे यांनी जिल्हा व दक्षता नियंत्रण समितीच्या बैठकीत समांतर जलवाहिनी योजनेची शहराला किती गरज आहे, यावर प्रकाश टाकत मनपाच्या यंत्रणेवर खापर फोडले होते. त्यावर पालकमंत्र्यांनी सोमवारी जिल्हा व नियोजन समितीच्या बैठकीत महापौर व आयुक्तांना टीकेचे लक्ष्य करून योजनेच्या विरोधाचा बार उडविला. खा. खैरे व मी चांगले मित्र आहोत. त्यांनी योजनेबाबत काय वक्तव्य केले मला माहिती नाही. दोघांत भांडणे लावू नका, असे त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितले. शिवाय योजनेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मनपाने हस्तक्षेप करू नये, अशा सूचना आयुक्तांना केल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयात मनपाने आजवर काय भूमिका मांडली. पालकमंत्री या नात्याने मला आजवर काहीही माहिती का दिली नाही. एकीकडे पारदर्शकता असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे निलंबित अधिकार्‍यांना कामावर घ्यायचे. समांतरच्या योजनेत सगळे अधिकार ठेकेदार कंपनीला दिलेले होते. १० हजारांचे बिल नागरिकांना दिले जात होते. गुंडांकडून पाणीपट्टी वसुली करण्याचा सपाटा सुरू केला होता. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाची भूमिका काय आहे ते स्पष्टपणे पुढे आले पाहिजे. त्या योजनेसाठी मनपाला मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ येते हे लज्जास्पद आहे. समांतर शहरासाठी घातक आहे. यासाठी स्वतंत्र बैठक घ्यावी, असे आदेशही त्यांनी दिले. 

आ. संजय शिरसाट म्हणाले, अडीच वर्षांपासून सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. दोन्ही बाजूंनी वकील मॅनेज होत असल्याचा संशय येतो आहे. आ. अतुल सावे म्हणाले, कोर्टाच्या बाहेर या योजनेत काही तडजोड होत असेल तर ते पाहावे. जेणेकरून शहराचा पाणी प्रश्न लवकर सुटेल. आयुक्त मुगळीकर म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. मनपाने तेथे बाजू मांडली आहे. यापुढे देखील मनपा बाजू मांडून पूर्ण ताकदीने मुद्दे मांडील. 

समांतरबाबत खा. खैरे काय म्हणाले होते... समांतर योजना मी आणली, मीच पूर्ण करणार. जनतेला वेठीस धरू नका, असा इशारा खा. चंद्रकांत खैरे यांनी १० जानेवारी रोजीच्या दक्षता समितीच्या बैठकीत पालिकेला दिला होता. पाणी प्रश्न हा शहरवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने मी समांतर योजना आणली, पूर्वी विरोध करणारेच आता योजना सुरू करण्यासाठी पाठिंबा दर्शवित आहेत. अधिकारी सोयीप्रमाणे अनेक योजनांमध्ये कार्यपूर्तता करण्यापेक्षा उद्देशांमध्ये बदल करतात. त्यामुळे योजना पूर्ण न होता सरकारवर बोजा पडत आहे. या योजनेसाठी पाठपुरावा केला. मात्र, समांतर योजना महापालिकेने बंद केली. अशा योजना बंद केल्या तर सरकार शहरासाठी नव्याने योजना देईल काय, असा सवालही खैरे यांनी केला होता. ही योजना सुरू असती तर आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असते. या योजनेपोटी महापालिकेकडे २५७ कोटी ३१ लाख जमा आहेत, हे पैसे योजनेसाठीच वापरायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाChandrakant Khaireचंद्रकांत खैरेMuncipal Corporationनगर पालिका