शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

पैठणच्या उद्यानातील संगीत कारंजे बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:19 IST

येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : येथील संत ज्ञानेश्वर उद्यानामधील संगीत कारंजे मागील दहा दिवसांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. प्रशासनाच्या कारभाराविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.राज्यभरातून सध्या येथे शाळेच्या सहली येत असून लहान मुलांना व पर्यटकांना आकर्षित करणारे मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्याच्या तालावर नृत्य करणारे संगीत कारंजे पाहावयास मुकावे लागत आहे. संगीत कारंजे बंद असल्याने पर्यटक पैठणमध्ये मुक्कामी न थांबता परतीचा प्रवास करत आहेत.त्यामुळे पर्यटकांवर अवलंबून असलेल्या धर्मशाळा, हॉटेल्स, उपहारगृह व पैठणी साडी व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.शासनाच्या उद्देशाला हरताळशासनाने जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर म्हैसूर व वृंदावन या उद्यानाच्या धर्तीवर येथे उद्यानाची निर्मिती केली. जायकवाडी धरण पर्यटकांचे आकर्षण असल्यामुळे येथे उद्यानाची निर्मिती करून शासनाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल, असा उद्देश ठेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने संत एकनाथ महाराजांच्या जन्मभूमीत हे उद्यान सुरू करण्यात आले. पर्यटकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल आतापर्यंत शासनाच्या तिजोरीत जमा झाला. परंतु शासनाने उद्यानाला विकसित करण्यापासून नेहमीच वंचित ठेवले आहे. त्यामुळेच उद्यानाची दुर्दशा पाहायला मिळत आहे. आता तरी या तुघलकी कारभारात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा पैठणकर व पर्यटनप्रेमी करीत आहेत.येथील उद्यानाला दररोज भेट देणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यातच नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शालेय सहली व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते व त्या काळात शहरातील बाजारपेठेत चांगली उलाढाल होते. नेमक्या याच वेळी संगीत कारंजे बंद पडल्याने पर्यटक मुक्काम न करताच माघारी फिरत असल्याने याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. संगीत कारंजे लवकरात लवकर सुरू करून उद्यान अजून प्रेक्षणीय कसे बनविता येईल, यासाठी उद्यानाच्या अधिकाºयांनी तातडीने पावले उचलावीत.-पवन लोहिया, व्यापारी, पैठण

टॅग्स :musicसंगीतWaterपाणी