शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीची वारी.. सामाजिकता आणि संस्कृतीचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 16:28 IST

महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘पंढरीच्या वाटे, वाट लागली चिखलाची.. वाट लागली चिखलाची, संग सोबत विठ्ठलाची’ अशा ओळी गुणगुणत आणि टाळ- चिपळ्यांच्या नादात निघालेल्या दिंडीतील प्रत्येकाला ओढ लागते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. सातशे वर्षांहूनही अधिक दीर्घ परंपरा असलेली पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिकतेसोबतच मराठी संस्कृतीचे, विविध कलागुणांचे जणू अधिष्ठान आहे. 

भजन, कीर्तन, ठिकठिकाणी होणारे प्रवचन, पावलीचा खेळ, विविध वाद्यांची साथसंगत यामुळे दिंडीचा हा सोहळा अद्भुत ठरतो. दिंडी ऐन भरात आल्यावर होणारा रिंगण सोहळा तर भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे. महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो आणि दिवसेंदिवस भाविकांचा दिंडीमध्ये वाढत जाणारा सहभाग वारीमध्ये असे काय रहस्य आहे, हे शोधायला प्रवृत्त करतो.

वारीचे दिवस जवळ येताच टाळ- चिपळ्या, मृदंग, पखवाज, पेटी आणि अशी बरीच एरव्ही कापडात गुंडाळून माळ्यावर ठेवून दिलेली चर्मवाद्ये, तंतूवाद्ये दुरुस्तीसाठी बाहेर येऊ लागतात. काही भजने नव्याने रचली जातात. विस्मरणात गेलेल्या अभंगांना उजाळा दिला जातो. या सगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून चाललेल्या हालचाली पाहिल्या की, पहिल्या पावसाच्या सरीसोबत दिंडीचा आधार घेऊन जणू सांस्कृतिकतेचे बीज नव्याने रोवले जात आहे की काय, असे वाटते. पंढरीची ही वारी आता के वळ कष्टकरी बांधवांपुरती आणि वारकरी संप्रदायापुरती मर्यादित राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून वारीचा हा ट्रेंड बदलत असून, शहरातील तथाकथित ‘हाय प्रोफाईल’ वारकरीही वारीमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये तरुणाईही मागे नाही. शहरांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुण मंडळीही वारीचे ‘प्लॅनिंग’ करताना दिसून येते. प्रत्येकाला आकर्षित करून घेणारे असे काय या दिंडी सोहळ्यात दडलेले आहे, हे अजूनही न उलगडलेले आणि दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत जाणारे ही कोडे आहे.

वारकरी परंपरा किंवा कीर्तन, प्रवचन, भारूड याकडे संतांनी कायम सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले आहे. हाच वारसा अजूनही या वारीतून झिरपताना दिसतो. आता तर अत्यंत नवनव्या पद्धती वापरून वारकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. आरोग्य, बेटी बचाओ, पाण्याचा वापर, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनापासून मुक्ती, या आणि अशा अनेक सामाजिक विषयांवर वारीत भर दिला जातो आणि प्रबोधन केले जाते. वारीत दिसून येणारा सेवाभावही निश्चितच उल्लेखनीय ठरतो.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSocialसामाजिकcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद