शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पंढरीची वारी.. सामाजिकता आणि संस्कृतीचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 16:28 IST

महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘पंढरीच्या वाटे, वाट लागली चिखलाची.. वाट लागली चिखलाची, संग सोबत विठ्ठलाची’ अशा ओळी गुणगुणत आणि टाळ- चिपळ्यांच्या नादात निघालेल्या दिंडीतील प्रत्येकाला ओढ लागते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. सातशे वर्षांहूनही अधिक दीर्घ परंपरा असलेली पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिकतेसोबतच मराठी संस्कृतीचे, विविध कलागुणांचे जणू अधिष्ठान आहे. 

भजन, कीर्तन, ठिकठिकाणी होणारे प्रवचन, पावलीचा खेळ, विविध वाद्यांची साथसंगत यामुळे दिंडीचा हा सोहळा अद्भुत ठरतो. दिंडी ऐन भरात आल्यावर होणारा रिंगण सोहळा तर भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे. महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो आणि दिवसेंदिवस भाविकांचा दिंडीमध्ये वाढत जाणारा सहभाग वारीमध्ये असे काय रहस्य आहे, हे शोधायला प्रवृत्त करतो.

वारीचे दिवस जवळ येताच टाळ- चिपळ्या, मृदंग, पखवाज, पेटी आणि अशी बरीच एरव्ही कापडात गुंडाळून माळ्यावर ठेवून दिलेली चर्मवाद्ये, तंतूवाद्ये दुरुस्तीसाठी बाहेर येऊ लागतात. काही भजने नव्याने रचली जातात. विस्मरणात गेलेल्या अभंगांना उजाळा दिला जातो. या सगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून चाललेल्या हालचाली पाहिल्या की, पहिल्या पावसाच्या सरीसोबत दिंडीचा आधार घेऊन जणू सांस्कृतिकतेचे बीज नव्याने रोवले जात आहे की काय, असे वाटते. पंढरीची ही वारी आता के वळ कष्टकरी बांधवांपुरती आणि वारकरी संप्रदायापुरती मर्यादित राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून वारीचा हा ट्रेंड बदलत असून, शहरातील तथाकथित ‘हाय प्रोफाईल’ वारकरीही वारीमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये तरुणाईही मागे नाही. शहरांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुण मंडळीही वारीचे ‘प्लॅनिंग’ करताना दिसून येते. प्रत्येकाला आकर्षित करून घेणारे असे काय या दिंडी सोहळ्यात दडलेले आहे, हे अजूनही न उलगडलेले आणि दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत जाणारे ही कोडे आहे.

वारकरी परंपरा किंवा कीर्तन, प्रवचन, भारूड याकडे संतांनी कायम सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले आहे. हाच वारसा अजूनही या वारीतून झिरपताना दिसतो. आता तर अत्यंत नवनव्या पद्धती वापरून वारकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. आरोग्य, बेटी बचाओ, पाण्याचा वापर, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनापासून मुक्ती, या आणि अशा अनेक सामाजिक विषयांवर वारीत भर दिला जातो आणि प्रबोधन केले जाते. वारीत दिसून येणारा सेवाभावही निश्चितच उल्लेखनीय ठरतो.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSocialसामाजिकcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद