शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

पंढरीची वारी.. सामाजिकता आणि संस्कृतीचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 16:28 IST

महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : ‘पंढरीच्या वाटे, वाट लागली चिखलाची.. वाट लागली चिखलाची, संग सोबत विठ्ठलाची’ अशा ओळी गुणगुणत आणि टाळ- चिपळ्यांच्या नादात निघालेल्या दिंडीतील प्रत्येकाला ओढ लागते ती विठ्ठलाच्या दर्शनाची. सातशे वर्षांहूनही अधिक दीर्घ परंपरा असलेली पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिकतेसोबतच मराठी संस्कृतीचे, विविध कलागुणांचे जणू अधिष्ठान आहे. 

भजन, कीर्तन, ठिकठिकाणी होणारे प्रवचन, पावलीचा खेळ, विविध वाद्यांची साथसंगत यामुळे दिंडीचा हा सोहळा अद्भुत ठरतो. दिंडी ऐन भरात आल्यावर होणारा रिंगण सोहळा तर भल्याभल्यांना अचंबित करणारा आहे. महाराष्ट्राचा हा सामाजिक आणि सांस्कृतिक मानबिंदू अगदी परदेशातील अभ्यासकांनाही हरखून टाकणारा ठरतो आणि दिवसेंदिवस भाविकांचा दिंडीमध्ये वाढत जाणारा सहभाग वारीमध्ये असे काय रहस्य आहे, हे शोधायला प्रवृत्त करतो.

वारीचे दिवस जवळ येताच टाळ- चिपळ्या, मृदंग, पखवाज, पेटी आणि अशी बरीच एरव्ही कापडात गुंडाळून माळ्यावर ठेवून दिलेली चर्मवाद्ये, तंतूवाद्ये दुरुस्तीसाठी बाहेर येऊ लागतात. काही भजने नव्याने रचली जातात. विस्मरणात गेलेल्या अभंगांना उजाळा दिला जातो. या सगळ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून चाललेल्या हालचाली पाहिल्या की, पहिल्या पावसाच्या सरीसोबत दिंडीचा आधार घेऊन जणू सांस्कृतिकतेचे बीज नव्याने रोवले जात आहे की काय, असे वाटते. पंढरीची ही वारी आता के वळ कष्टकरी बांधवांपुरती आणि वारकरी संप्रदायापुरती मर्यादित राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून वारीचा हा ट्रेंड बदलत असून, शहरातील तथाकथित ‘हाय प्रोफाईल’ वारकरीही वारीमध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आहेत. यामध्ये तरुणाईही मागे नाही. शहरांमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरुण मंडळीही वारीचे ‘प्लॅनिंग’ करताना दिसून येते. प्रत्येकाला आकर्षित करून घेणारे असे काय या दिंडी सोहळ्यात दडलेले आहे, हे अजूनही न उलगडलेले आणि दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत जाणारे ही कोडे आहे.

वारकरी परंपरा किंवा कीर्तन, प्रवचन, भारूड याकडे संतांनी कायम सामाजिक प्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले आहे. हाच वारसा अजूनही या वारीतून झिरपताना दिसतो. आता तर अत्यंत नवनव्या पद्धती वापरून वारकऱ्यांचे प्रबोधन केले जाते. आरोग्य, बेटी बचाओ, पाण्याचा वापर, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, शिक्षणाचे महत्त्व, व्यसनापासून मुक्ती, या आणि अशा अनेक सामाजिक विषयांवर वारीत भर दिला जातो आणि प्रबोधन केले जाते. वारीत दिसून येणारा सेवाभावही निश्चितच उल्लेखनीय ठरतो.

 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSocialसामाजिकcultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबाद