शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पंढरपुरात पिता-पुत्रांची दोघांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 21:57 IST

हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन दोघांना जबर मारहाण

वाळूज महानगर : हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन पिता-पुत्रांनी दोघांना जबर मारहाण करुन जखमी केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) सायंकाळी पंढरपुरातील तिरंगा चौकात घडली.

पवन साळवे (२६) व त्याचा मित्र प्रदीप मिसाळ (३२, दोघेही रा. पंढरपूर) यांना तिरंगा चौकात रात्री ७ वाजता हॉटेलसमोर दुचाकी लावण्याच्या कारणावरुन नितीन गिरी व त्याचे वडिल त्र्यंबक गिरी यांच्यात वाद झाला होता.

पवन व प्रदीप दोघेही या पिता-पुत्राला समजावून सांगत असताना त्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. या भांडणात नितिनने लगतच्या हॉटेलमधून झाऱ्या आणुन पवनच्या डोक्यात मारला. बचावासाठी प्रदीप मिसाळ आला असता नितीनने गरम तेलाची कडई प्रदीपच्या अंगावर फेकली.

कढईतील गरम तेल प्रदीपच्या हातावर व अंगावर पडल्याने तो भाजला आहे. व्यवसायिक पद्माबाई गोसावी व नासेर पठाण यांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवत दोघा पिता-पुत्रांच्या तावडीतून दोघांची सुटका केली. या मारहाणीत पवन साळवे व प्रदीप मिसाळ दोघेही जखमी झाले असून त्यांना घाटी रुग्णालयात पाठविले.

याप्रकरणी पवन साळवे यांच्या तक्रारीवरुन नितीन गिरी व त्र्यंबक गिरी या पिता-पुत्राविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :WalujवाळूजCrime Newsगुन्हेगारी