शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
6
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
7
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
8
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
9
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
10
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
11
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
12
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
13
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
14
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
15
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
16
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
17
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
18
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
19
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
20
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रगतीपथावर

By admin | Updated: September 26, 2016 00:07 IST

लातूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरले असून, नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. या पुरामध्ये वाहून गेलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे

लातूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरले असून, नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. या पुरामध्ये वाहून गेलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे काम विमा कंपनी, कृषी विभागाचा प्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्या स्थानिक समितीमार्फत सुरू करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ९२२ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पही तुडूंब भरले असून, नदीकाठच्या गावांतील पिके पाण्याखाली आली आहेत. या नदीकाठच्या गावांतील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनासह स्थानिक स्तरावरील समितीमार्फत तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले असल्याने पंचनाम्याच्या कामांना गती आली आहे. दरम्यान, आठवडाभरात झालेल्या पावसामुळे उर्वरित पिकेही पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पिके वाळली आहेत. काही ठिकाणी पाण्याखाली आली आहेत. तर गावांतील पिकांना मोड आल्याने सोयाबीन, तूर व इतर खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाचा कर्मचारी, कृषी विभागाचा कर्मचारी व विमा कंपनीचा प्रतिनिधी यांची स्थानिक समिती निर्माण केली आहे. या समितीने तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, असे आदेश देऊनही कृषी विभागाचे पंचनाम्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंचनाम्यांच्या कामाकडे विमा कंपनीकडूनही दुर्लक्ष होत आहे. पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपनी, कृषी व तहसील प्रशासनाला दिले आहेत. परंतु, कृषी विभागाने मात्र या पंचनाम्यातून विभक्त होऊन सदरील पंचनाम्याच्या जबाबदारी विमा कंपनीकडे दिली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंंह कदम यांनी सांगून पंचनाम्याच्या कामातून पळवाट काढली आहे. तर इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मात्र नदीला पूर आल्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असल्याचे सांगून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती विमा कंपनीचे अधिकारी मोदाणी यांनी दिली. पूर्वी नुकसानग्रस्त भागांतील पिकांचे पंचनामे तात्काळ केले जायचे. परंतु, यावर्षी मात्र पंचनाम्याची पद्धत प्रशासनाने बदलली आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची लेखी तक्रार केल्यावर संबंधित तहसीलदारांकडून कृषी विभागाला सूचना दिल्या जात आहेत. त्यानंतर महसूल व कृषी विभाग, विमा कंपनीकडून पंचनामे केले जात आहेत.