शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पालेभाज्यांचे भाव कडाडले

By admin | Updated: May 3, 2016 00:02 IST

लातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़

हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलोलातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़ बाजारपेठेतील आवकच कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत़ बाजार समितीकडून निघालेल्या भावापेक्षा रयतू बाजारात या भाज्यांचे दर चढलेले आहेत़ हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत़ यामुळे गृहिणींचे किचन बिघडले आहे़कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे़ वांगे १५, भेंडी १८, पत्ता कोबी ३८, फुलकोबी ८, गावरान टमाटे १८, वैशाली टमाटे ३१, गवार शेंगा ३, पालक ७, शेवगा १५, गाजर १, भोपळा ६, कोथिंबीर १०, हिरवी मिरची ६०, वैशाली मिरजी ७, बटाटे १०़५०, लसून १००, कांदे ९६०, लिंबू ९, काकडी २१ टन आवक आहे़ आवक कमी असल्यामुळे या सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत़ वांग्याचा सरासरी भाव १० किलोसाठी ३०० रुपये आहे़ तर भेंडीचा २५० रुपये आहे़ हिरव्या मिरचीचा ५०० रुपये भाव आहे़ बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये निघालेला हा भाव असून, ग्राहकांना रयतू बाजारातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या दराने पडतो़ हिरवी मिरचीचा भाव १० किलोसाठी ५०० रुपये असला तरी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ८० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे़ (प्रतिनिधी)बार्शी रोडवरील रयतू बाजारात ग्राहकांना वांगे ६० रुपये, भेंडी ४० रुपये, पत्ताकोबी ४० रुपये, गावरान टमाटे ३० रुपये, गवार शेंगा ४० रुपये, पालक पेंढी १५ रुपये, शेवगा ४० रुपये, भोपळा ४०, कोथिंबीर ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वैशाली मिरची १२५ रुपये, बटाटे २० रुपये, आद्रक ६० रुपये, लसून ८० रुपये, कांदे २० रुपये, काकडी १० रुपये किलोप्रमाणे आहे़