शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पैठणचे पाणी माजलगावला

By admin | Updated: February 13, 2016 23:53 IST

माजलगांव : माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणातून जवळपास २

माजलगांव : माजलगाव धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून पैठणच्या जायकवाडी धरणातून जवळपास २ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांना पिण्यासाठी सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्हा व माजलगाव धरण परिसरात यावर्षी अत्यल्प पाउस झाल्याने धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली असल्याने या उन्हाळयात या धरणाचे पाणी पिण्यासाठी पुरेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. माजलगाव धरण भरण्यासाठी ४३१.८० मी. एवढे पाणी आवश्यक असताना पावसाळा संपल्यानंतरही या धरणाच्या जोत्यालादेखील पाणी आले नाही व सध्या या धरणाची पाणी पातळी ९ मीटरने कमी झाली असून, शुक्र वारी ही पातळी ४२३.६६ मी. एवढी होती, तर हीच पातळी १० जानेवारी रोजी ४२३.२१ मी. एवढी होती. १० जानेवारी रोजी पैठण धरणातून १.७६ टी.एम.सी. एवढे पाणी माजलगाव धरणात कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. हे पाणी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून धरणात येणे सुरू असून, आणखी दोन दिवस हे पाणी सुरु राहण्याची शक्यता आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेले शेतकरी अवैध उपसा करून आपल्या पिकांना पाणी देतात. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असतो. जर अशाच प्रकारे उपसा चालू राहिला तर हेच पाणी दोन महिने देखील पुरणार नाही. त्यामुळे या मोटारी बंद करून प्रशासनाने यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. (वार्ताहर)