शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

पैठणची ‘घाटी’कोमात; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 18:38 IST

असुविधेमुळे रुग्णांनी जावे तरी कोठे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

- संजय जाधव

पैठण (औरंगाबाद ) : पैठणकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या रूग्णालयात रूग्णांच्या जीवाशी खेळ मांडला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे रुग्णालय पैठणचे घाटी रुग्णालय म्हणून ओळखले जाते. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयासारख्या येथे सुविधा असल्या तरी प्रशासकीय उदासिनतेने या घाटीचा बट्ट्याबोळ झाला आहे. यामुळे रुग्णांनी जावे तरी कोठे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.

पाच वैद्यकीय अधिकारी असलेल्या या रूग्णालयात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी आहे. मागील काही वर्षांपासून येथे डॉक्टरांसह परिचारिका, कक्षसेवक, सफाईदार, लॅब टेक्नीशियनची अशी सुमारे ३५ टक्के पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कर्मचारी गायब होते. हे कर्मचारी कोठे गेले, हे विचारण्यासाठी सुद्धा कोणीच तेथे उपलब्ध नव्हते. या परिस्थितीत रूग्णांची हेळसांड होताना मात्र दिसून आली. यातच पाहणीदरम्यान रूग्णालयात रूग्णांच्या रक्ताचे नमुने चक्क चतुर्थ श्रेणी कर्मचारी घेत असल्याचे दिसून आले. यामुळे शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांचे मात्र हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनुष्यबळाअभावी रुग्णांना सोयी-सुविधा मिळत नाहीत, उपचारासाठी तासन्तास थांबावे लागते. यामुळे शासकीय रुग्णसेवाच आजारी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रपाठक व वैद्यकीय अधिकारी कायमच गैरहजरशासकीय रुग्णालयात प्रपाठक डॉ. भारत चव्हाण, डॉ. सचिन अवसरमल, डॉ. अनिरुद्ध लोंढे, डॉ. कणसे, डॉ. संदीप रगडे व ऋषीकेष मानधने असे सहा वैद्यकीय अधिकारी आहेत. गुरूवारी दुपारच्या सत्रात रूग्णालयात डॉ. खणसे हेच उपस्थित होते. उर्वरित डॉक्टरांबाबत विचारले असता आॅनकॉलवर हे डॉक्टर रूग्णालयात येतात असे त्यांनी सांगितले. मात्र डॉ. कणसे हेच ओपीडी व आयपीडीच्या रूग्णांना तपासत असल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एक वैद्यकीय अधिकारी तर चक्क १५ दिवसांपासून रूग्णालयातच आला नसल्याचे रूग्णालयातील विश्वासू सूत्राने सांगितले. इतर दोन डॉक्टरांचे पैठण शहरात मोठे हॉस्पिटल असून ते डॉक्टर तेथेच असतात. रूग्णालयात मात्र एकच वैद्यकीय अधिकारी हजर राहतो व तो सर्वांची ड्युटी करतो. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर डॉक्टर उपलब्ध न झाल्याने रूग्णांच्या जीवावर बेतत आहे.

वरिष्ठांनी लक्ष घालावे

रूग्णालयात रूग्णाप्रती डॉक्टरांची संपुष्टात आलेली आस्था, भौतिक सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता व नोकरी आहे म्हणून करायची या भावनेतून केली जाणारी रूग्णसेवा रूग्णांच्या जीवावर उठली असल्याची भावना पैठणकरांच्या मनात निर्माण झाली आहे. रूग्णालयातील प्रशासन वठणीवर आणून रूग्णसेवा सुरळीत करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरmedicineऔषधं