शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पैठण तालुक्यात एक जण वाहून गेला, तर भिंत पडून वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:02 IST

पैठण : मंगळवारी रात्री पैठण तालुक्यातील सात महसूल मंडळांत मंगळवारी अतिवृष्टीची नोंद झाली असून, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ...

पैठण : मंगळवारी रात्री पैठण तालुक्यातील सात महसूल मंडळांत मंगळवारी अतिवृष्टीची नोंद झाली असून, पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बोकूड जळगाव येथे एकाचा, तर भिंंत अंगावर पडल्याने नांदर येथे एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील सर्वच पाझर तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने तलावाखालील गावांतील नागरिकांनी रात्र जागून काढली. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने आतोनात नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पैठण तालुक्याला पाऊस झोडपून काढत आहे. मंगळवारी पुन्हा सात महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी बिडकीन ११४ मि.मी., आडूळ ११७, ढोरकीन ७१, बालानगर ७५, नांदर ७४, पाचोड ७०, विहामांडवा ७३ मि.मी. असा पाऊस झाला. वीरभद्रा, येळगंगा, गल्हाटी नद्यांना महापूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. औरंगाबाद-पैठण रस्त्यावर चार ठिकाणी नदीप्रमाणे पाणी वाहत असल्याने रात्री वाहतूक बंद होती.

चौकट

दुचाकीसह एक जण वाहून गेला

नांदर येथे मंगळवारी रात्री भिंत पडल्याने दबून सुंदराबाई गरड (९०) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर रात्री १० वाजेदरम्यान मुलासह दुचाकीने बोकूडजळगावकडे जात असताना गावाच्या अलीकडील ओढ्यात आलेल्या महापुरात कोंडिराम लोखंडे (४६) हे दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान, सुदैवाने मुलगा वाचला. कोंडिराम लोखंडेंना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके, बिडकीनचे पोनि. संतोष माने, फौजदार राहुल पाटील, मंडळ अधिकारी बोकूडजळगाव येथे तळ ठोकून आहेत.

चौकट

चार जनावरे दगावली

पावसादरम्यान पाटोदे वडगाव येथील कडूबाळ आवारे यांच्या शेतातील गोठ्यावर विद्युत खांबावरील तार तुटून पडल्याने गाय व शेळ्या मरण पावल्या.

चौकट

नांदर पुलाच्या दोन कमानी वाहून गेल्याने वाहतूक बंद

वीरभद्रा नदीला गेल्या चार दिवसांपासून महापूर आलेला आहे. या पुराच्या तडाख्यात नांदर येथील पुलाच्या दोन कमानी वाहून गेल्या आहेत. दरम्यान, या पुलावरील चारचाकी वाहतूक बंद करण्यात आली असून, पूर ओसरल्यानंतर पुलाची किती क्षती झाली हे समोर येणार आहे. आडगाव जावळे, इनायतपूर येथील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाखालील गावांतील नागरिकांनी रात्र जागून काढली. विविध नदी- नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

फोटो :