शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पाडापाडी; बिल्डर रस्त्यावर

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला असून, शनिवार आणि रविवारी कारवाई स्थगित असल्याने बिल्डरांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली अन् पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर आंदोलकांची पळापळ झाली. यावेळी पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेऊन सायंकाळी जामिनावर सोडले. जयाजी अण्णासाहेब सूर्यवंशी, विशाल गजानन कुलकर्णी, राजेंद्र गजानन कुलकर्णी, नामदेव गणपत बाजड, अश्पाक अमीन, अजमतउल्ला पठाण, शेख अजहर, सय्यद अजहर स. युसूफ अशा आठ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा परिसरात नगर परिषदेने धोकादायक ३५० नवीन इमारतधारकांना अनधिकृत बांधकाम दाखवून पाडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसांना बिल्डरांनी केराची टोपली दाखवली होती. त्यांनी ग्रामपंचायतीने आतापर्यंत दिलेल्या नोटिशींनाही काही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे नगर परिषदेच्या नोटिशींनी काय होणार, असा गैरसमज बिल्डर लॉबीचा झाला होता; परंतु न्यायालय व जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या आदेशाने सिंघम प्रशासक विजय राऊत यांनी नगर परिषदेच्या हद्दीतील धोकादायक व एफएसआयच्या नियमात न बांधलेल्या कामांवर हातोडा टाकला. त्यांनी चार दिवसांच्या कालावधीत १२ अतिरिक्त बांधकामांवरील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ब्रेकर आणि हातोडा चालवून ते नष्ट केले. यामुळे बिल्डर लॉबीत प्रशासनाविषयी संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्यांनी ४ डिसेंबर रोजी निदर्शनासाठी परवानगी काढली होती, त्यावेळी काही कारणास्तव निदर्शने रद्द करण्यात आली; परंतु रविवारी सर्वांची कामे बंद असल्याने बिल्डर आणि कामगारांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. पगार मागायला आले अन् पोलिसांनी पकडून नेले...सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने पाडापाडी सुरू झाल्याने बांधकामे बंद करण्यात आली, त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.रविवारी मजुरी घेण्यासाठी मजूर आणि फ्लॅटधारकही आता आमच्या घराचे काय, असे विचारण्यासाठी सातारा परिसरात आले होते, त्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविल्याने त्यांना अटक करून सायंकाळी जामिनावर सोडून दिले, असे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले. आम्ही स्वत:हून बांधकाम काढत आहोत...सातारा-देवळाई परिसरात नगर परिषदेने हातोडा कारवाई सुरू केली असून, बहुतांश बिल्डर स्वत:च बांधकामे काढण्यासाठी सरसावले आहेत. त्या प्रकारचे शपथपत्रही प्रशासनाकडे करून दिले आहे, असे बिल्डरच्या वतीने नामदेव बाजड व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमानुसार हातोडा सुरूच राहील...सातारा-देवळाई परिसरातील एफएसआयच्या नियमात नसलेल्या अतिरिक्त बांधकामांवर आदेशानुसार अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा सुरूच राहणार आहे, असे प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.