शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

जिल्ह्यात कोरोना मृत्यूवर मात, २१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ४ आणि ग्रामीण भागातील १७ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ४ आणि ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही आणि बुधवार हा सप्टेंबरमधील पहिलाच कोरोनामुक्त दिवस ठरला. उपचार घेऊन २० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

जिल्ह्यात सध्या २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ४१६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५५७ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २० रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात १४ दिवसांत २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये कधी दिवसभरात एक, कधी दिवसभरात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, बुधवार जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. शहरात निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही एकेरी आकड्यात आहे. ग्रामीण भागात वैजापूर तालुक्यात दरराेज सर्वाधिक रुग्ण आढळणे सुरूच आहे.

------

मनपा हद्दीतील रुग्ण

गौतमनगर १, घाटी परिसर १, अन्य २

ग्रामीण भागातील रुग्ण

औरंगाबाद १, गंगापूर ४, खुलताबाद १, वैजापूर ९, पैठण २