शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

‘शाळाबाह्य’ चे सर्वेक्षण ‘फेल’

By admin | Updated: December 18, 2015 23:47 IST

विजय सरवदे, औरंगाबाद स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत जानेवारी महिन्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

विजय सरवदे, औरंगाबाद स्वयंसेवी संस्था तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत जानेवारी महिन्यामध्ये शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ४ जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात सरकारी यंत्रणेद्वारे केलेले शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण अयशस्वी झाल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे, हे विशेष! राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ही प्रक्रिया निरंतर चालू आहे. मात्र, शासनाच्या या मोहिमेला आतापर्यंत अपेक्षित यश आलेले नाही. अशी किती मुले शाळेत दाखल केली. पुढे ती किती टिकली. किती जण दहावीच्या पुढे शिकली, याचा कोणताही ताळेबंद शिक्षण विभागाकडे नाही. शाळाबाह्य मुलांच्या अडचणीवर मात करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याऐवजी केवळ एक फार्स म्हणून दरवर्षी अशा प्रकारची मोहीम राबविली जाते, असा आरोप शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी केला आहे. प्रामुख्याने वाडी, वस्त्या, तांडे, पाड्यांवर जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण झाले पाहिजे. मराठवाड्यातील अनेक कुटुंब ऊसतोड कामासाठी स्थलांतरित होत असतात. त्यामुळे केवळ गाव-खेड्यात सर्वेक्षण न करता कामाच्या ठिकाणी (उसाच्या फडात) अशा प्रकारचे सर्वेक्षण व्हायला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. ४ जुलै रोजी झालेल्या सर्वेक्षणामध्ये मराठवाड्यात ७ हजार ५००, तर औरंगाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून २१०० शाळाबाह्य मुले आढळून आली होती. यापैकी किती मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले, यावर कोणीही ठामपणे सांगत नाही. तथापि, आजही हजारो मुले शाळेच्या प्रवाहापासून दूर असल्याचे स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये शाळाबाह्य मुलांच्या पुनर्सर्वेक्षण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.