शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य विद्यार्थी; प्रवेशासाठी ‘डेडलाईन’

By admin | Updated: August 11, 2015 00:59 IST

औरंगाबाद : चार जुलै रोजी झालेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात ६५७ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुलांना

औरंगाबाद : चार जुलै रोजी झालेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात ६५७ शाळाबाह्य मुले आढळून आली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुलांना १५ आॅगस्टपूर्वी प्रवेश दिल्याचा अहवाल शिक्षण विभागास सादर करावा, असे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिले आहेत.शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यानुसार ही जबाबदारी सरकारीच आहे. यासाठी राज्यात एकाच दिवशी ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये हॉटेल्स, वीटभट्ट्या, गॅरेज, गुरे सांभाळणारी तसेच आई-वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांच्यासोबत मजुरी करणारी जवळपास ६५७ मुले आढळून आली होती. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना त्यांच्या पसंतीनुसार खाजगी किवा जि. प. शाळेमध्ये प्रवेश देण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची आहे; पण सर्वेक्षण झाल्यानंतर तब्बल महिनाभरापासून ही मुले अजूनही शाळेपर्यंत पोहोचलेली नाहीत. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या प्रवेशाबाबत विचारणा करताच शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या. येत्या १५ आॅगस्टपर्यंत ही संपूर्ण शाळाबाह्य मुले शाळेत आली पाहिजेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या असून, सदरील मुलांना प्रवेश दिल्याचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जि. प. शिक्षक संघटनांच्या काही नेत्यांकडे यासंदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले की, शिक्षकांनी कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे, ते अगोदर शिक्षण विभागाने ठरवावे. सध्या ‘सरल’ योजनेंतर्गत शिक्षकांना १५ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा ‘डाटा बेस’ आॅनलाईन अपडेट करण्याची सक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, आता शाळबाह्य मुलांना शाळेत आणून त्याला प्रवेश द्यायचा आणि त्यासंबंधीचा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांना द्यायचा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कधी शिकवायचे, यासंबंधी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार त्या- त्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एखादा मुलगा कधीच शाळेत गेला नसेल, तर त्या मुलाला प्रवेश देताना त्याच्या पालकाकडून वयाचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. ४असे असले तरी सदरील शाळाबाह्य मुलांना जवळच्या शाळांमध्ये प्रवेश दिल्यानंतर अपेक्षित सुविधांबाबत मात्र, निश्चित धोरण ठरलेले नाही. ४त्यामुळे या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहाराबाबतचा प्रश्न अनुत्तरितच आहे.