शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कर्जातून सुटला, सावकारीत अडकला

By admin | Updated: June 24, 2017 23:49 IST

नांदेड: आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे़

शिवराज बिचेवार । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्याचा गवगवा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे़ या निर्णयाचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़ परंतु दुसरीकडे हाच शेतकरी मात्र वर्षानुवर्षे सावकारीच्या जाळ्यात अडकला आहे़ दरवर्षी सावकारीची प्रकरणे वाढतच जात असून सध्या उपनिबंधक कार्यालयाकडे अशा १५ प्रकरणांची सुनावणी सुरु आहे़ सावकारी वर्षानुवर्षे चालत आली आहे़ काळाच्या ओघात बारा बलुतेदारी पद्धत नामशेष झाली आहे़ मात्र सावकारीची भरभराटच होत आहे़ धनदांडग्यांच्या उपजीविकेचे आणि अधिकचे उत्पन्न कमाविण्याचे सावकारी हे प्रमुख साधन बनले आहे़ त्यामुळे अडल्या-नडल्यांना वेळेवर मदत मिळत असली तरी, सावकारांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे़ त्यानंतर शासनाने अधिकृत सावकारी अन् अनधिकृत सावकारी अशी विभागणी केली़ बँकेत कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसाठी खेटे मारण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांनी गावातीलच सावकारांचे उंबरठे ओलांडल्याचे चित्र आजही पहावयास मिळते़ त्यामुळे बँकांतील कर्जाची माफी झाली असली तरी, प्रत्यक्षात सावकारांच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांवर कायम राहणार आहे़ उपनिबंधक कार्यालयाकडून सावकारांना अधिकृत परवानेही दिले़ आहेत. आजघडीला जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या २४२ एवढी आहे़ दरवर्षी त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते़ त्यांच्याबाबत तक्रारी आल्या अन् त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जात नाही़ शेती आणि बिगरशेती कर्जासाठी व्याजाचे दर निश्चित केले असताना अनेक सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी केली जाते़ अशा जिल्ह्यात मार्चपर्यंत उपनिबंधक कार्यालयाकडे एकूण १५ तक्रारी आल्या आहेत़ त्यांची सध्या सुनावणी सुरु आहे़ या सुनावणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात येणार आहे़ गतवर्षी अशा एकूण ५६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु त्यामध्ये आतापर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही, हे विशेष! तर ग्रामीण भागातील अनेक प्रकरणे समोरच येत नाहीत, हेही तितकेच वास्तव आहे़ त्यामुळे सावकारीचा पाश दिवसेंदिवस आणखी घट्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.