शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरीयेथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ११ गावातील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. यातच डाव्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. त्यामुळे वाहत जाणाऱ्या पाण्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याशिवाय शेकऱ्यांकडे पर्याय नाही. सध्या केवळ गावठाणचाच वीजपुरवठा सुरू आहे.तीर्थपुरी ३३ केव्हीमध्ये ५ एमव्हीएचे दोन रोहित्र असून, त्यातील ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ रोजी रात्री ११ वाजता अचानक जळाल्याने त्या रोहित्रावर तीर्थपुरी गावठाण, कंडारी गावठाण, जिनिंग व रामसगाव शेती पुरवठा अशा वाहिन्या होत्या. तर दुसऱ्या ५ एमव्हीएवर कंडारी, रामसगाव व भायगव्हाण शेती पुरवठा करणाऱ्या वाहिन्या होत्या. या जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत सध्या केवळ कंडारी, भायगव्हाण व तीर्थपुरी हिच गावठाण फिडर चालू असून, तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, खा. हिवरा, शेवता, जोगलादेवी, रामसगाव, रूई असे ११ गावाच्या शेतीला होणारा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. सध्या पैठण डाव्या कालव्यातून पाणी पाळी चालू आहे.यातच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहे. परंतु सध्या शेतीला कापूस, तूर, गव्हासाठी ऊस, फळबागासाठी पाणी घेणे गरजेचे असताना केवळ वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी घेता येत नाही. डोळ्यासमोरुन पाणी वाहत जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वरील ११ गावाच्या जवळपास ३५० डिप्या बंद आहेत. कनिष्ठ अभियंता पवार यांना विचारले असतो, रोहित्राची मागणी केली असून, दोन दिवसात तो रोहित्र येईल, असे सांगितले.या गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.