शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरीयेथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ११ गावातील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. यातच डाव्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. त्यामुळे वाहत जाणाऱ्या पाण्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याशिवाय शेकऱ्यांकडे पर्याय नाही. सध्या केवळ गावठाणचाच वीजपुरवठा सुरू आहे.तीर्थपुरी ३३ केव्हीमध्ये ५ एमव्हीएचे दोन रोहित्र असून, त्यातील ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ रोजी रात्री ११ वाजता अचानक जळाल्याने त्या रोहित्रावर तीर्थपुरी गावठाण, कंडारी गावठाण, जिनिंग व रामसगाव शेती पुरवठा अशा वाहिन्या होत्या. तर दुसऱ्या ५ एमव्हीएवर कंडारी, रामसगाव व भायगव्हाण शेती पुरवठा करणाऱ्या वाहिन्या होत्या. या जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत सध्या केवळ कंडारी, भायगव्हाण व तीर्थपुरी हिच गावठाण फिडर चालू असून, तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, खा. हिवरा, शेवता, जोगलादेवी, रामसगाव, रूई असे ११ गावाच्या शेतीला होणारा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. सध्या पैठण डाव्या कालव्यातून पाणी पाळी चालू आहे.यातच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहे. परंतु सध्या शेतीला कापूस, तूर, गव्हासाठी ऊस, फळबागासाठी पाणी घेणे गरजेचे असताना केवळ वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी घेता येत नाही. डोळ्यासमोरुन पाणी वाहत जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वरील ११ गावाच्या जवळपास ३५० डिप्या बंद आहेत. कनिष्ठ अभियंता पवार यांना विचारले असतो, रोहित्राची मागणी केली असून, दोन दिवसात तो रोहित्र येईल, असे सांगितले.या गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.