शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या

बद्रीनाथ मते ,तीर्थपुरीयेथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ११ गावातील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. यातच डाव्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. त्यामुळे वाहत जाणाऱ्या पाण्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याशिवाय शेकऱ्यांकडे पर्याय नाही. सध्या केवळ गावठाणचाच वीजपुरवठा सुरू आहे.तीर्थपुरी ३३ केव्हीमध्ये ५ एमव्हीएचे दोन रोहित्र असून, त्यातील ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ रोजी रात्री ११ वाजता अचानक जळाल्याने त्या रोहित्रावर तीर्थपुरी गावठाण, कंडारी गावठाण, जिनिंग व रामसगाव शेती पुरवठा अशा वाहिन्या होत्या. तर दुसऱ्या ५ एमव्हीएवर कंडारी, रामसगाव व भायगव्हाण शेती पुरवठा करणाऱ्या वाहिन्या होत्या. या जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत सध्या केवळ कंडारी, भायगव्हाण व तीर्थपुरी हिच गावठाण फिडर चालू असून, तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, खा. हिवरा, शेवता, जोगलादेवी, रामसगाव, रूई असे ११ गावाच्या शेतीला होणारा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. सध्या पैठण डाव्या कालव्यातून पाणी पाळी चालू आहे.यातच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहे. परंतु सध्या शेतीला कापूस, तूर, गव्हासाठी ऊस, फळबागासाठी पाणी घेणे गरजेचे असताना केवळ वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी घेता येत नाही. डोळ्यासमोरुन पाणी वाहत जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वरील ११ गावाच्या जवळपास ३५० डिप्या बंद आहेत. कनिष्ठ अभियंता पवार यांना विचारले असतो, रोहित्राची मागणी केली असून, दोन दिवसात तो रोहित्र येईल, असे सांगितले.या गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.