शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

ग्रामपंचायतींवर आमचाच झेंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात महाविकास आघाडी आणि भाजपत दावेबाजी सुरू झाली आहे. ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात महाविकास आघाडी आणि भाजपत दावेबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेने ३६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व केल्याचा दावा करीत जिल्ह्यात मुसंडी मारल्याचा जल्लोष सुरू केला आहे, तर भाजपने २३८० सदस्य जिल्ह्यात निवडून आल्याने आमची ताकद वाढल्याचा सूर आळविला आहे. काँग्रेसने जिल्ह्यात ५० टक्के ग्रामपंचायतींवर झेंडा फडकेल असे भाकीत केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १८९ ग्रामपंचायतींवर पक्षाचे सदस्य सरपंच होतील, असा दावा केला आहे. या सगळ्या गर्दीत मनसेनेही ७७ सदस्य निवडून आल्याने आनंदोत्सव साजरा केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने एकूण ६१६ जागांपैकी ३६० ठिकाणी स्वबळावर बहुमत मिळविले आहे. ७२ ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकेल, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे, तर भाजप जिल्ह्यात सर्वांत जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकावर असल्याचे खा. डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे.

शिवसेना ३६०, भाजप २०८, काँग्रेस ३००, राष्ट्रवादी काँग्रेस १८९ या राजकीय दाव्यांची गोळाबेरीज केली, तर १ हजार ५७ ग्रामपंचायती होतात. मुळात ६१७ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ३२ ठिकाणी ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले. ६ ठिकाणी मतदान झाले नाही. ५७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान व मतमोजणी झाली. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साडेअकरा लाख मतदारांनी ४ हजारांच्या आसपास सदस्य निवडून दिले.

शिवसेनेचा दावा असा

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत २८७ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानुसार शिवसेनेची संख्या ३६० वर गेली आहे, असे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात भाजपच आघाडीवर

२०८ ग्रामपंचायती भाजपच्या असतील. ४५ ठिकाणी संमिश्र कौल मिळाला आहे. भाजपचे २३८१ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जिह्यातील ग्रामीण राजकारणात भाजपच आघाडीवर आहे, असा दावा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केला.

५० टक्के ठिकाणी काँग्रेस

जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. चांगला प्रतिसाद राहिला आहे. उरलेल्या जागांवर महाविकास आघाडीचे यश असल्यामुळे भाजप बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. कल्याण काळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच होतील

१८९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. त्या ठिकाणी सरपंचदेखील होतील. हे स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे यश आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर आणखी ५० जागा वाढतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

मनसेचा ग्रामीण राजकारणात प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण राजकारणात नव्या दमाने प्रवेश करीत ७७ सदस्य निवडून आणले आहेत, असा दावा जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी केला आहे. सहा तालुक्यांत मनसेचे सदस्य निवडून आले आहेत.