शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ग्रामपंचायतींवर आमचाच झेंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात महाविकास आघाडी आणि भाजपत दावेबाजी सुरू झाली आहे. ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात महाविकास आघाडी आणि भाजपत दावेबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेने ३६० ग्रामपंचायतींवर वर्चस्व केल्याचा दावा करीत जिल्ह्यात मुसंडी मारल्याचा जल्लोष सुरू केला आहे, तर भाजपने २३८० सदस्य जिल्ह्यात निवडून आल्याने आमची ताकद वाढल्याचा सूर आळविला आहे. काँग्रेसने जिल्ह्यात ५० टक्के ग्रामपंचायतींवर झेंडा फडकेल असे भाकीत केले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १८९ ग्रामपंचायतींवर पक्षाचे सदस्य सरपंच होतील, असा दावा केला आहे. या सगळ्या गर्दीत मनसेनेही ७७ सदस्य निवडून आल्याने आनंदोत्सव साजरा केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेने एकूण ६१६ जागांपैकी ३६० ठिकाणी स्वबळावर बहुमत मिळविले आहे. ७२ ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बहुमत प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील ४३२ ग्रामपंचायतींवर भगवा फडकेल, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे, तर भाजप जिल्ह्यात सर्वांत जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकावर असल्याचे खा. डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे.

शिवसेना ३६०, भाजप २०८, काँग्रेस ३००, राष्ट्रवादी काँग्रेस १८९ या राजकीय दाव्यांची गोळाबेरीज केली, तर १ हजार ५७ ग्रामपंचायती होतात. मुळात ६१७ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ३२ ठिकाणी ६१० सदस्य बिनविरोध निवडून आले. ६ ठिकाणी मतदान झाले नाही. ५७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान व मतमोजणी झाली. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साडेअकरा लाख मतदारांनी ४ हजारांच्या आसपास सदस्य निवडून दिले.

शिवसेनेचा दावा असा

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत २८७ ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात होत्या. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानुसार शिवसेनेची संख्या ३६० वर गेली आहे, असे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात भाजपच आघाडीवर

२०८ ग्रामपंचायती भाजपच्या असतील. ४५ ठिकाणी संमिश्र कौल मिळाला आहे. भाजपचे २३८१ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे जिह्यातील ग्रामीण राजकारणात भाजपच आघाडीवर आहे, असा दावा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केला.

५० टक्के ठिकाणी काँग्रेस

जिल्ह्यातील ५० टक्के ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. चांगला प्रतिसाद राहिला आहे. उरलेल्या जागांवर महाविकास आघाडीचे यश असल्यामुळे भाजप बऱ्यापैकी संपुष्टात आला आहे, असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. कल्याण काळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच होतील

१८९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. त्या ठिकाणी सरपंचदेखील होतील. हे स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे यश आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर आणखी ५० जागा वाढतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

मनसेचा ग्रामीण राजकारणात प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामीण राजकारणात नव्या दमाने प्रवेश करीत ७७ सदस्य निवडून आणले आहेत, असा दावा जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी केला आहे. सहा तालुक्यांत मनसेचे सदस्य निवडून आले आहेत.