शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आधार देणे ही आपलीच गरज- पाटेकर

By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय.

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे सद्गदित उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करताना येथे काढले. तेव्हा सभागृहात अनेकांना आपले हुंदके रोखता आले नाहीत. पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी हे क्षण हृदयात कोरून बळीराजाच्या उतराईसाठी वज्रमूठ कसली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत यावर्षी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश, साडी व ब्लॅकेटचे वाटप नाना पाटेकर व मराठवाड्याचा भूमिपुत्र, प्रसिद्ध सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यातर्फे सोमवारी करण्यात आले. 1कोणताही पक्ष हा जनतेला सुविधा पुरविण्याचे माध्यम आहे, असे सांगून नाना पाटेकर म्हणाले, मग तो विरोधी पक्ष असो किंवा सरकार. या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सोबत येऊन एकत्र काम केले पाहिजे. हा वाईट काळ संपला की तुम्ही परस्परात भांडायला मोकळे आहात. कोणत्याही सरकारवर आपणास टीका करायची नाही, असेही ते म्हणाले. काहीच नाही, काय करू ?2हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाची मुलगी आहे. तिघेच राहतो. कुणाचाच सहारा नाही. घर नाही. भाड्याने राहते. घरभाड्याला पैसे नाही. काय खाऊ, कसं राहू, असे म्हणत कविता सोमनाथ राऊत या २२ वर्षीय विधवेला रडे आवरले नाही. ती तेथेच धाय मोकलून रडू लागली. नाना पाटेकरांनी सांत्वन करून तिला शांत केले. परंतु त्यानंतर ती एक शब्दही बोलली नाही. ६७ वर्षे झाली स्वातंत्र्याला सरकारने शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली? परंतु आम्ही रॉबिनहूड नाही होऊ शकत, असा उद्वेग व्यक्त करून नाना म्हणाले, सरकार जे देतं ते झिरपत झिरपत खाली जातं. ४हे झिरपणं आम्ही रोखलं पाहिजे. या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.