शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:59 IST

विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा.

जीवनात काही दिवस असे असतात की, ते कायम स्मरणात राहतात, काही दिवस असेही असतात जे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात, काही आठवणी अशा असतात त्या डोळ्यांत पाणी आणतात, तर काही ओठांवर हसू फुलवतात. मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या काही आठवणींना उजाळा देताना माजी शिक्षणाधिकारी के.डी. पगारे हे अतिशय भाऊक होतात. वयाची शंभरी गाठलेले के.डी. पगारे आजही ‘मिलिंद’च्या आठवणी तेवढ्याच ताजेपणाने सांगतात. भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या पगारेंच्या वाट्याला अतिशय हालअपेष्टांचे जीवन आले. प्रखर जातीभेदाचे चटके त्यांना सहन करावे लागले. 

ते सांगतात की, मराठवाड्यात अस्पृश समाजाला माणूस म्हणून वागविले जात नव्हते. लंगोटाशिवाय अंगात दुसरे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. १९४३ साली चौथी पास झालो. त्यानंतर १९४६ साली सातवी पास झालो. हसनाबादजवळील देऊळगावमही येथील पगारे कुटुंब पोट भरण्यासाठी औरंगाबादेत भडकलगेट येथे राहत होते. त्यांच्या आग्रहानुसार मी पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आलो. सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत तेव्हा सरकारी शाळा होती. दहावीपर्यंत तेथे शिकलो. जून १९५० मध्ये बारावी पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. छावणीत बराकीमध्ये पोलीस महाविद्यालयाचे वर्ग भरायचे. बाबासाहेबांनी महाविद्यालयात तज्ज्ञ व निष्णात प्राध्यापकांची नेमणूक केली होती. विविध जाती, धर्म, पंथाचे विद्यार्थी, प्राध्यापक येथे होते. मागासवर्गीय मुलांनी त्यांच्यासोबत बसावे, खेळावे, जेवण करावे, त्यांचा सहवास लाभावा, हा व्यापक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता.

या महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, समाजोद्धाराचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. बाबासाहेब गप्पा करताना विद्यार्थ्यांमध्ये रममाण व्हायचे. ते विद्यार्थ्यांचे नाव, गाव, कुठपर्यंत शिकणार, शिकून पुढे काय करणार, असे प्रश्न विचारायचे. अशाच एकावेळी नारायण ओहोळकर नावाचा विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला, बाबा मी तुमच्याइतकाच शिकणार व तुमच्यासारखी समाजसेवा करणार. त्यावर बाबासाहेब म्हणाले, सांग बरं माझ्या पदव्या? एकाही विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. मी बी.ए.ला असताना १९५२ ची ती घटना. ‘मिलिंद’च्या उभारणीमध्ये हातभार लागावा म्हणून भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांना दहा हजारांची थैली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. समाजबांधवांनी घरातील भांडीकुंडी विकून या कार्यास मदत केली. दहा हजारांची थैली अर्पण केली. त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, मोरे यापुढे समाजाला त्रास देऊ नका. हा पैसा समाजाच्या मेहनतीचा आहे. या पैशात मानवता आहे. चारित्र्य आहे. शील आहे. माझे कॉलेज लवकर सुरू होईल. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब मोरे यांनी मला एलएल.बी. कर व समाजोद्धाराच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता.

मिलिंद महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. 

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन