शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:59 IST

विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा.

जीवनात काही दिवस असे असतात की, ते कायम स्मरणात राहतात, काही दिवस असेही असतात जे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात, काही आठवणी अशा असतात त्या डोळ्यांत पाणी आणतात, तर काही ओठांवर हसू फुलवतात. मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या काही आठवणींना उजाळा देताना माजी शिक्षणाधिकारी के.डी. पगारे हे अतिशय भाऊक होतात. वयाची शंभरी गाठलेले के.डी. पगारे आजही ‘मिलिंद’च्या आठवणी तेवढ्याच ताजेपणाने सांगतात. भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या पगारेंच्या वाट्याला अतिशय हालअपेष्टांचे जीवन आले. प्रखर जातीभेदाचे चटके त्यांना सहन करावे लागले. 

ते सांगतात की, मराठवाड्यात अस्पृश समाजाला माणूस म्हणून वागविले जात नव्हते. लंगोटाशिवाय अंगात दुसरे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. १९४३ साली चौथी पास झालो. त्यानंतर १९४६ साली सातवी पास झालो. हसनाबादजवळील देऊळगावमही येथील पगारे कुटुंब पोट भरण्यासाठी औरंगाबादेत भडकलगेट येथे राहत होते. त्यांच्या आग्रहानुसार मी पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आलो. सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत तेव्हा सरकारी शाळा होती. दहावीपर्यंत तेथे शिकलो. जून १९५० मध्ये बारावी पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. छावणीत बराकीमध्ये पोलीस महाविद्यालयाचे वर्ग भरायचे. बाबासाहेबांनी महाविद्यालयात तज्ज्ञ व निष्णात प्राध्यापकांची नेमणूक केली होती. विविध जाती, धर्म, पंथाचे विद्यार्थी, प्राध्यापक येथे होते. मागासवर्गीय मुलांनी त्यांच्यासोबत बसावे, खेळावे, जेवण करावे, त्यांचा सहवास लाभावा, हा व्यापक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता.

या महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, समाजोद्धाराचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. बाबासाहेब गप्पा करताना विद्यार्थ्यांमध्ये रममाण व्हायचे. ते विद्यार्थ्यांचे नाव, गाव, कुठपर्यंत शिकणार, शिकून पुढे काय करणार, असे प्रश्न विचारायचे. अशाच एकावेळी नारायण ओहोळकर नावाचा विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला, बाबा मी तुमच्याइतकाच शिकणार व तुमच्यासारखी समाजसेवा करणार. त्यावर बाबासाहेब म्हणाले, सांग बरं माझ्या पदव्या? एकाही विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. मी बी.ए.ला असताना १९५२ ची ती घटना. ‘मिलिंद’च्या उभारणीमध्ये हातभार लागावा म्हणून भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांना दहा हजारांची थैली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. समाजबांधवांनी घरातील भांडीकुंडी विकून या कार्यास मदत केली. दहा हजारांची थैली अर्पण केली. त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, मोरे यापुढे समाजाला त्रास देऊ नका. हा पैसा समाजाच्या मेहनतीचा आहे. या पैशात मानवता आहे. चारित्र्य आहे. शील आहे. माझे कॉलेज लवकर सुरू होईल. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब मोरे यांनी मला एलएल.बी. कर व समाजोद्धाराच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता.

मिलिंद महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. 

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन