शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांत रमायचे बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:59 IST

विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा.

जीवनात काही दिवस असे असतात की, ते कायम स्मरणात राहतात, काही दिवस असेही असतात जे संपूर्ण जीवनच बदलून टाकतात, काही आठवणी अशा असतात त्या डोळ्यांत पाणी आणतात, तर काही ओठांवर हसू फुलवतात. मिलिंद महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या काही आठवणींना उजाळा देताना माजी शिक्षणाधिकारी के.डी. पगारे हे अतिशय भाऊक होतात. वयाची शंभरी गाठलेले के.डी. पगारे आजही ‘मिलिंद’च्या आठवणी तेवढ्याच ताजेपणाने सांगतात. भोकरदन तालुक्यातील पेरजापूर येथे अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या पगारेंच्या वाट्याला अतिशय हालअपेष्टांचे जीवन आले. प्रखर जातीभेदाचे चटके त्यांना सहन करावे लागले. 

ते सांगतात की, मराठवाड्यात अस्पृश समाजाला माणूस म्हणून वागविले जात नव्हते. लंगोटाशिवाय अंगात दुसरे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. १९४३ साली चौथी पास झालो. त्यानंतर १९४६ साली सातवी पास झालो. हसनाबादजवळील देऊळगावमही येथील पगारे कुटुंब पोट भरण्यासाठी औरंगाबादेत भडकलगेट येथे राहत होते. त्यांच्या आग्रहानुसार मी पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत आलो. सध्याच्या जिल्हा परिषद इमारतीत तेव्हा सरकारी शाळा होती. दहावीपर्यंत तेथे शिकलो. जून १९५० मध्ये बारावी पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. छावणीत बराकीमध्ये पोलीस महाविद्यालयाचे वर्ग भरायचे. बाबासाहेबांनी महाविद्यालयात तज्ज्ञ व निष्णात प्राध्यापकांची नेमणूक केली होती. विविध जाती, धर्म, पंथाचे विद्यार्थी, प्राध्यापक येथे होते. मागासवर्गीय मुलांनी त्यांच्यासोबत बसावे, खेळावे, जेवण करावे, त्यांचा सहवास लाभावा, हा व्यापक दृष्टिकोन बाबासाहेबांचा होता.

या महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, समाजोद्धाराचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. बाबासाहेब गप्पा करताना विद्यार्थ्यांमध्ये रममाण व्हायचे. ते विद्यार्थ्यांचे नाव, गाव, कुठपर्यंत शिकणार, शिकून पुढे काय करणार, असे प्रश्न विचारायचे. अशाच एकावेळी नारायण ओहोळकर नावाचा विद्यार्थी बाबासाहेबांना म्हणाला, बाबा मी तुमच्याइतकाच शिकणार व तुमच्यासारखी समाजसेवा करणार. त्यावर बाबासाहेब म्हणाले, सांग बरं माझ्या पदव्या? एकाही विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. मी बी.ए.ला असताना १९५२ ची ती घटना. ‘मिलिंद’च्या उभारणीमध्ये हातभार लागावा म्हणून भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांना दहा हजारांची थैली अर्पण करण्याचा निर्णय घेतला. समाजबांधवांनी घरातील भांडीकुंडी विकून या कार्यास मदत केली. दहा हजारांची थैली अर्पण केली. त्यावेळी बाबासाहेबांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले, मोरे यापुढे समाजाला त्रास देऊ नका. हा पैसा समाजाच्या मेहनतीचा आहे. या पैशात मानवता आहे. चारित्र्य आहे. शील आहे. माझे कॉलेज लवकर सुरू होईल. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब मोरे यांनी मला एलएल.बी. कर व समाजोद्धाराच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले; परंतु घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी मला नोकरीशिवाय पर्याय नव्हता.

मिलिंद महाविद्यालयात ममतेचे, समतेचे, अन्यायाविरुद्ध रणकंदन करणारे वातावरण होते. विद्यार्थ्यांसोबत हितगुज करताना बाबासाहेबांना खूप आनंद व्हायचा. 

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन