शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत.

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत. असे असतानाही पालकमंत्र्यांकडे मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशी कार्यालये सुरू ठेवून उपयोग तरी काय? असा सवाल करीत पालकमंत्री, कृषीमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा आमदार राजणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. पाटील म्हणाले की, जानेवारी २०१६ पासून जिल्हाभरातील सुमारे १०८ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांनी साडेपाचशे कोटींचे पॅकेज जाहीर केले. गतवर्षी यातील केवळ १२ कोटी मिळाले. त्याचाही प्रभावीपणे वापर झाला नाही. यावर्षी पुरवणी मागणीमध्ये केवळ १५ कोटी देण्यात आले. प्रत्येक वर्षी असे दहा-बारा कोटी दिल्यास साडेपाचशे कोटी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी केला. कळंब तालुक्यात आजवर केवळ २६३ मिमी म्हणजेच २९.१६ टक्के पाऊस झाला. वाशी, उस्मानाबाद तालुक्यात ४१ टक्के, आणि परंडा तालुक्यात ३८ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. सातत्याने चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनासह प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. परंतु, या प्रश्नी ना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत ना संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेवून परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे हे दोघेहे जिल्ह्यातील परिस्थितीबाबत गंभिर नसल्याचे स्पष्ट होत असे आ. पाटील म्हणाले.(प्रतिनिधी)