शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत.

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत. असे असतानाही पालकमंत्र्यांकडे मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशी कार्यालये सुरू ठेवून उपयोग तरी काय? असा सवाल करीत पालकमंत्री, कृषीमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा आमदार राजणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. पाटील म्हणाले की, जानेवारी २०१६ पासून जिल्हाभरातील सुमारे १०८ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांनी साडेपाचशे कोटींचे पॅकेज जाहीर केले. गतवर्षी यातील केवळ १२ कोटी मिळाले. त्याचाही प्रभावीपणे वापर झाला नाही. यावर्षी पुरवणी मागणीमध्ये केवळ १५ कोटी देण्यात आले. प्रत्येक वर्षी असे दहा-बारा कोटी दिल्यास साडेपाचशे कोटी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी केला. कळंब तालुक्यात आजवर केवळ २६३ मिमी म्हणजेच २९.१६ टक्के पाऊस झाला. वाशी, उस्मानाबाद तालुक्यात ४१ टक्के, आणि परंडा तालुक्यात ३८ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. सातत्याने चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनासह प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. परंतु, या प्रश्नी ना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत ना संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेवून परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे हे दोघेहे जिल्ह्यातील परिस्थितीबाबत गंभिर नसल्याचे स्पष्ट होत असे आ. पाटील म्हणाले.(प्रतिनिधी)