शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत.

उस्मानाबाद : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना फटका बसला. शेतकरी पिकांच्य नुकसानीचे तर ग्रामस्थ पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची मागणी करीत आहेत. असे असतानाही पालकमंत्र्यांकडे मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे अशी कार्यालये सुरू ठेवून उपयोग तरी काय? असा सवाल करीत पालकमंत्री, कृषीमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी बैठक घेऊन दुष्काळी परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, असा इशारा आमदार राजणाजगजितसिंह पाटील यांनी दिला. येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. पाटील म्हणाले की, जानेवारी २०१६ पासून जिल्हाभरातील सुमारे १०८ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांनी साडेपाचशे कोटींचे पॅकेज जाहीर केले. गतवर्षी यातील केवळ १२ कोटी मिळाले. त्याचाही प्रभावीपणे वापर झाला नाही. यावर्षी पुरवणी मागणीमध्ये केवळ १५ कोटी देण्यात आले. प्रत्येक वर्षी असे दहा-बारा कोटी दिल्यास साडेपाचशे कोटी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी केला. कळंब तालुक्यात आजवर केवळ २६३ मिमी म्हणजेच २९.१६ टक्के पाऊस झाला. वाशी, उस्मानाबाद तालुक्यात ४१ टक्के, आणि परंडा तालुक्यात ३८ टक्के एवढे अत्यल्प पर्जन्यमान झाले. सातत्याने चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनासह प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. परंतु, या प्रश्नी ना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत ना संपर्कमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बैठक घेवून परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे हे दोघेहे जिल्ह्यातील परिस्थितीबाबत गंभिर नसल्याचे स्पष्ट होत असे आ. पाटील म्हणाले.(प्रतिनिधी)