शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

उस्मानाबादचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल !

By admin | Updated: August 27, 2015 00:00 IST

उस्मानाबाद : कुटुंब कल्याण, माता व बालसंगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमात एक ते दीड वर्षांपूर्वी २५ व्या स्थानावर असलेल्या उस्मनाबादच्या

उस्मानाबाद : कुटुंब कल्याण, माता व बालसंगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमात एक ते दीड वर्षांपूर्वी २५ व्या स्थानावर असलेल्या उस्मनाबादच्या आरोग्य विभागाने पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. तर दुसरीकडे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा लातूर जिल्हा ३० व्या स्थानावर आहे.साधारणपणे एक ते दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सातत्याने चर्चेत असायचा, तो वेगवेगळ्या तक्रारींमुळे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत आरोग्ये यंत्रणा सदस्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असायची. कधी डॉक्टरांच्या रिक्त जागांवरून, कधी बंद असलेल्या शस्त्रक्रियागृहांवरून तर कधी आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवरून सभागृहामध्ये वादळी चर्चा व्हायची. अनेकवेळा थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचे आरोप होत होते. त्यानंतर काही दिवसांतच खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारीच लाच घेताना पकडले गेले. त्यामुळे या विभागाची प्रतिमा प्रचंड मलिन झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. आर. बी. पवार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने आरोग्य विभागाची प्रतिमा सुधारण्यास सुरूवात झाली. कुटुंब कल्याण कार्यक्रमावर शासन लाखोंचा खर्च करीत आहे. असे असतानाही जिल्ह्यात हा उपक्रम ठप्प होता. कारण प्राथमिक आरोग्य केंद्रातील ७० टक्के आॅपरेशन थिअटर बंद होते. हे सर्व थिअटर सुरू केल्यामुळे कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांचा आलेख उंचावला असून जिल्हा यात पहिल्या स्थानावर पोहोंचला आहे. तसेच रुग्णालयीन प्रसुतींच्या प्रमाणातही वाढ झाली. जेथे वर्षभरात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून अडीच ते तीन हजार प्रसुती होत असत. तेथे चालू वर्षात अवघ्या चार महिन्यात प्रसुतींचा आकडा दीड हजारावर जावून ठेपला आहे. वर्षाअखेर (२०१५-१६) प्रसुतींची ही संख्या सहा हजारावर पोहोंचेल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी व्यक्त केला. माता व बालसंगोपन उपक्रमालाही गती मिळाली आहे. गरोदर माता आणि बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माता-बालकांना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘मातृत्व संवर्धन दिन’ साजरा केला जातो. आरोग्य केंद्रात हा उपक्रम घेवून एकही बालक औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. याही उपक्रमात जिल्हा अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, नियमित लसिकरणातही जिल्हा पिछाडीवर होता. कधी वाहन नसल्याने तर कधी नियोजनाअभावी लस वाटप ठप्प व्हायचे. हाही प्रश्न मार्गी लागल्याने आता प्रत्येक महिन्याला आरोग्य केंद्रावर जावून लस वाटप केले जात आहे. यासाठी शासनाने सोयीसुविनायुक्त अशी व्हॅन जिल्हा परिषदेला दिली आहे. त्याचाही चांगला फायदा होत असल्याने याही उपक्रमात जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. (प्रतिनिधी)प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आॅपरेशन थिअटरची उभारणी करण्यात आली होती. परंतु, विविध कारणांमुळे जवळपास ७० टक्के प्रसुतीगृह (आॅपरेशन थिअटर) वापरात नव्हते. त्यामुळे रूग्णालयीन प्रसुतींचा आलेख खालावला होता. २०१४ मध्ये माकणी सारख्या आरोग्य केंद्रात महिन्याकाठी सरासरी तीन प्रसुती झाल्या आहेत. काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी पाच असे प्रमाण होते. हे चिंताजनक चित्र लक्षात घेवून सर्व आरोग्य केंद्रांच्या प्रसुतीगृहांची दुरूस्ती करण्यात आली आहे. तसेच सर्जनचीही कमतरता होती. त्यामुळे आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांनाच प्रशिक्षित करण्यात आले आहे. परिणामी अवघ्या चार महिन्यात रूग्णालयीन प्रसुतींची संख्या १ हजार ५३५ वर जावून ठेपली. उवर्रित आठ महिन्यात हा आकडा ६ हजार १४० वर जावून ठेपेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट असणार आहे.