शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मराठवाडा साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

By admin | Updated: April 4, 2016 00:35 IST

जालना : मराठवाडा साहित्य परिषदेचे ३७ वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना शहरातील श्री गुरुगणेश साहित्यनगरीत ९ व १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची

जालना : मराठवाडा साहित्य परिषदेचे ३७ वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना शहरातील श्री गुरुगणेश साहित्यनगरीत ९ व १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी यांनी पत्रपरिषदेत दिली.या दोन दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, तीन परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, विशेष सत्कार, प्रकट मुलाखत, कवी कट्टा, बालमेळावा आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.श्रीगुरुगणेश साहित्यनगरीत नऊ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्य उद्घाटन सोहळा गुरुगणेश व्यासपीठावर सकाळी १० वाजता होईल. संमेलनाध्यक्ष नाटककार दत्ता भगत, लक्ष्मीकांत देशमुख, कवी ना. धो. महानोर यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. अर्जुन खोतकर, उद्योजक घनश्याम गोयल, शांतीलाल पित्ती, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा यांची उपस्थिती राहणार आहे.या संमेलनात पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले, समीक्षक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे, क्रीडापटू विजय झोल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी कवी भ. मा. परसवाळ यांची प्रकट मुलाखत डॉ. संजीवनी तडेगावकर, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे घेतील. १०.३० ते १२.३० प्रा. ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी कवितेला मराठवाड्यातील कवींचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रा. डॉ. शशिकांत पाटील, प्रा. डॉ. केशव तुपे, प्रा. डॉ. कल्पना जाधव, प्रा. भाऊसाहेब राठोड यांचा सहभाग राहील. दु. १२.३० वाजता प्राचार्य भगवान देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. यात राम निकम, सत्यशिला तौर, विठ्ठल बोकन, स्वाती कानेगावकर, अंबादास केदार, भास्कर बढे यांचा सहभाग राहील. दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान प्रा. भगवंत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आराजकतेच्या काळात संत साहित्य हेच खरे उत्तर आहे’ यावर परिसंवाद होणार असून त्यात प्रा. डॉ. विद्यासागर पाटंगणकर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, मार्तंड कुलकर्णी, प्रा. भगवान काळे, सय्यद जब्बार पटेल, प्रा. डॉ. हंसराज जाधव यांचा सहभाग राहिल. संमेलनात महंदबा व्यासपीठावर कवि फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवि संमेलन होणार आहे.दु.२ वा. विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची अवकळा, नोकरशहा आणि मराठी राजकारणी’ यावर परिसंवाद होईल. ४ वाजता नाट्यांजलीचा भरतनाट्यम कार्यक्रम, सायं. ६ वाजता ‘आकडा’ नाटक, ८ ते १० दरम्यान कवि संमेलन, सायंकाळी समारोप बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी डॉ. संजीवनी तडेगावकर, ज्येष्ठ कवी प्रा. जयराम खेडेकर, अनया अग्रवाल, पवन जोशी आदी उपस्थित होते.