शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

आत्महत्या होऊ नयेत यासाठी जनजागृतीची जबाबदारी आयोजकांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:28 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने धोरणात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी नामंजूर केली.

ठळक मुद्दे -खंडपीठाचे मत- मराठा आरक्षणासाठीच्या आत्महत्या रोखण्याबाबत शासनाने धोरणात्मक भूमिका घेण्यासंदर्भातील याचिका नामंजूर

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने धोरणात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी नामंजूर केली.मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने निघालेले मोर्चे आणि विविध मार्गांनी सुरू असलेली आंदोलने अतिशय संघटितपणे आणि संघटनात्मक पातळीवर आयोजित केलेली असतात. यामध्ये सहभागी होणाºयांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, आत्महत्येसारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी त्यांच्यामध्ये जगजागृती निर्माण करणे हीे मोर्चा अथवा आंदोलनाच्या आयोजकांचीच जबाबदारी असल्याचे मत नोंदवित खंडपीठाने याचिका नामंजूर केली.लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ता सचिन सुभाष सोळुंके यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यांनी विभागीय आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी केले आहे. याचिकाकर्ता हे स्वत: मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. या मागणीसाठी ५२ मोर्चे अतिशय शांततेने आणि सनदशीर मार्गाने काढण्यात आले. मात्र, आरक्षणाचा विषय सुटलेला नसल्याने यातील काही तरुणांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्या. अशा आत्महत्या रोखण्याकरिता शासन पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. या आंदोलनांदरम्यान झालेल्या आत्महत्याग्रस्तांचे पुनर्वसन आणि सहभागी सर्वच गटातील नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन केंद्राची आवश्यकता आहे. ते स्थापन करण्याचे निर्देश शासनाला देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.सुनावणीअंती खंडपीठाने आदेशात नमूद केले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याचिकेतील त्या संदर्भातील मुद्दे विचारार्थ घेता येणार नाहीत. मात्र, आपल्या मागणीसाठी आंदोलन उभारताना, मोर्चे आयोजित करताना यामध्ये फक्त तरुणच नव्हे तर सर्वच गटातील लोक सहभागी होत असतात याची आयोजकांना जाणीव हवी. मोर्चाची संपूर्ण जबाबदारी ही मोर्चा आयोजन करणारांची असते. त्यामुळे त्यांनी जनजागृती करायला हवी. यात सहभागींचे समुपदेशन करून, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कुणीही उचलू नये यासाठी समुपदेशन करायला हवे. आपले जीवन अमूल्य आहे, ते अशा पद्धतीने पणाला लावणे योग्य नाही याची जाणीव आयोजकांनी द्यायला हवी, असे मत नोंदवित खंडपीठाने याचिका नामंजूर केली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयreservationआरक्षण