शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कृषी निविष्ठांच्या नियंत्रणासाठी कृषीची भरारी पथके तैनात

By admin | Updated: May 11, 2015 00:32 IST

लातूर : येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे व किटक नाशके योग्य दर्जाची मिळावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हंगामापूर्वीच दक्षता घेतली आ

लातूर : येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे व किटक नाशके योग्य दर्जाची मिळावीत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हंगामापूर्वीच दक्षता घेतली आहे़ जिल्हा व तालुका स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला असून, भरारी पथकेही कार्यान्वयीत केली आहेत़ खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ आॅगस्ट व रबी हंगामासाठी १५ सप्टेबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत पथके व नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत़ त्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना आपला मुळ पदभार सांभाळून कक्षात व पथकात काम करण्याचे निर्देष दिले आहेत़लातूर जिल्ह्यातील बी-बियाणे, खत व किटक नाशके विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना योग्य दर्जाची व योग्य वेळी व योग्य किंमतीत मिळावीत म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्याने तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके स्थापन केली आहेत़ शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचीही जबाबदारी स्विकारली आहे़ तक्रार निवारण कक्ष जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर असेल़ खत, बी-बियाणे व किटक नाशकाच्या तक्रारी प्राप्त होताच त्याची नोंदवहीमध्ये नोंद करुन घेतली जाईल़ तक्रारीचे स्वरुप, तक्रार प्राप्त दिनांक, वेळ व त्याला केलेले मार्गदर्शन या बाबी नोंदवहीत नमुद असतील़ तक्रार निवारण कक्ष सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील़ तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे सर्व कृषी विकास अधिकारी, आयुक्तालयातील अधिकारी, जिल्हा व तालुक्यातील सर्व विक्रेत्यांचा दुरध्वनी क्रमांक असेल़ कक्षप्रमुख म्हणून जिल्हा कृषी अधिकारी असतील, त्यांना आपला मुळ कार्यभार सांभाळून तक्रार निवारण कक्षात दुपारी २़३० ते सायंकाळी ७ पर्यंत उपस्थित राहणे बंधनकारक असेल, कार्यालयीन अधिक्षकांसही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तक्रार निवारण कक्षात असणे बंधनकारक आहे़ तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी कक्षप्रमुख असतील, त्यांनाही जिल्हा स्तरावरचा नियम लागू असेल़ तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तक्रारीची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षीत आहे़ कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात सादर करणे बंधनकारक आहे़ (प्रतिनिधी)