शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संघटनेने क्लब क्रिकेट, साखळी स्पर्धा सुरू करण्यास पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:49 IST

औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.

ठळक मुद्देखेळाडू संघटनेची मागणी : एडीसीए मैदानावरील टेनिसबॉलवरील स्पर्धा बंद करा

औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.सध्या जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धाच जास्त होत आहेत. औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे स्पर्धांचे आयोजन होत नाही. त्यामुळे त्यांना औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास भाग पडते. तेथे या स्पर्धेचा अनुभवाच्या दृष्टीने विशेष फायदा खेळाडूंना होत नाही. त्यांचा कस तेथे लागत नाही. त्यामुळे जिल्हा क्रिकेट संघटनेने १४, १६ व १९ वर्षांखालील तसेच सिनिअर गटासाठीदेखील स्पर्धेचे आयोजन करून त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळायला हवी. त्याचप्रमाणे स्पर्धेआधी त्यांचा दोन महिने कसून सराव घेतला जावा; परंतु ऐनवेळी संघ निवडला जातो. खेळाडूंना अनुभव मिळावा यासाठी वनडे स्पर्धेची क्लब क्रिकेट स्पर्धा आणि दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यास जिल्हा क्रिकेट संघटनेने पुढाकार घ्यायला हवा, असे खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. विकास नगरकर याच्यावरील बंदी हटल्यानंतरही शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेत खेळू न दिले जाणे हा स्पर्धा आयोजकांकडून खेळाडूंचाच नव्हे, तर जिल्हा क्रिकेट संघटनेचा अपमान असल्याची भावनाही यावेळी खेळाडू संघटनेने व्यक्त केली. सध्या पंचदेखील स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे पंचांनी अशा वेळेस फक्त आयोजकांचीच भूमिका पार पाडायला हवी, त्यांनी पंचांची जबाबदारी पार पाडू नये. पंचांनीही काही वाद असेल तर मैदानातच सोडवायला हवेत, असेही खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. बैठकीत औरंगाबादचे ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक शेख हबीब यांनी खेळाडूंच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ खेळाडू दिनेश कुंटे, प्रशिक्षक विनोद माने, कर्मवीर लव्हेरा, शेख रफिक, पंकज फलके, मिलिंद पाटील, विजय अडलाकोंडा, बॉबी खेत्रे, विवेक येवले, प्रदीप जगदाळे, विकास नगरकर, वसीम खान, संदीप जाधव, प्रीतेश चार्ल्स, अजय काळे, प्रदीप जाधव, विशाल नरवडे, पंच अ‍ॅड. बाळासाहेब वाघमारे, विद्याधर पांडे, सिद्धार्थ भरणे, बळवंत चव्हाण आणि विनोद जाधव यांची उपस्थिती होती.