शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यादेशांनी वाढविला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST

खरीप हंगामातील शेतकºयांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी काढण्यात येणाºया विम्याच्या संदर्भात राज्य शासनाने पाच दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी चार वेगवेगळे आदेश काढल्यानेच शेतकºयांच्या गोंधळात भर पडल्याची स्थिती दिसत आहे़ विशेष म्हणजे ४ आॅगस्ट रोजी शेवटचा अध्यादेश निघाला असून, त्यात पुन्हा एकदा सूचना दिल्याने मुदत संपेपर्यंत तरी गोंधळ संपतो की नाही असा सवाल उपस्थित होत आहे़

प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामातील शेतकºयांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी काढण्यात येणाºया विम्याच्या संदर्भात राज्य शासनाने पाच दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी चार वेगवेगळे आदेश काढल्यानेच शेतकºयांच्या गोंधळात भर पडल्याची स्थिती दिसत आहे़ विशेष म्हणजे ४ आॅगस्ट रोजी शेवटचा अध्यादेश निघाला असून, त्यात पुन्हा एकदा सूचना दिल्याने मुदत संपेपर्यंत तरी गोंधळ संपतो की नाही असा सवाल उपस्थित होत आहे़तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती अनुभवल्याने यावर्षी शेतकरी सजग झाला आहे़ आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून घेण्यासाठी शेतकºयांचा कल वाढला आहे़ त्यातूनच पीकविमा काढण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते़ खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने २० जूनपासून सुरुवात केली़ ३१ जुलै ही विमा काढण्याची अखेरची तारीख होती़ सुमारे दीड महिन्यांचा कालावधी शेतकºयांकडे उपलब्ध होता़ मात्र शेवटच्या क्षणी गोंधळ झालाच़ राज्य शासनाने हा विमा आॅनलाईन काढण्याचे धोरण स्वीकारले़ शासनाच्या आदेशानुसार महा-ई-सेवा केंद्रांवरून आॅनलाईन विमा भरण्याचे आवाहन करण्यात आले़ मात्र परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागापर्यंत इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसल्याने अनेक शेतकºयांना विमा काढता आला नाही़ अखेर आॅफलाईन विमा भरण्यात यावा आणि तो बँकांनी स्वीकारावा, या मागणीने जोर धरला़ त्यामुळे मुदतीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आॅफलाईन आणि आॅनलाईन असा दोन्ही पद्धतीने बँकांमार्फत विमा स्वीकारण्यात आला़ त्यामुळे ३० आणि ३१ जुलै रोजी जिल्हाभरात विम्यासाठीचा गोंधळ झाला़ बँकांसमोर रांगा, शेतकºयांचे जागरण आणि आंदोलनेही झाली़ अखेर शासनाने विम्यास मुदतवाढ देण्याचे जाहीर केले़ ३१ जुलै रोजी रात्री ११़३० वाजता विमा रकम भरण्यास ५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली़ परंतु, या एकाच आदेशावर शासन थांबले नाही तर याच अनुषंगाने विविध चार आदेश काढण्यात आले़ त्यामुळे गोंधळ वाढत गेला़ विमा उतरविण्याच्या संदर्भात शासनाचेच धोरण गोंधळाचे असल्याने या त्रासातून जावे लागले़ अखेरपर्यंत रांगेत उभा राहून आणि मनस्ताप सहन करून शेतकºयांना विमा उतरवावा लागला़ या त्रासाला शासकीय धोरणच जबाबदार ठरत आहे़