शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश

By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST

हिंगोली: जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी बुधवारी तलाठ्यांच्या उपस्थिती बाबतचे स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महसूल विभागामध्ये गुरूवारी खळबळ उडाली.

हिंगोली: जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ‘लोकमत’च्या विविध ठिकाणच्या प्रतिनिधींनी बुधवारी तलाठ्यांच्या उपस्थिती बाबतचे स्टिंग आॅपरेशन केल्यानंतर महसूल विभागामध्ये गुरूवारी खळबळ उडाली. कामचुकार तलाठ्याचे पितळ उघडे पडल्याने जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सकाळीच वॉटस् अ‍ॅपवर पाचही तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना बातमीचे कात्रण पाठवून या बाबत चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.सध्या शैक्षणिक कादगपत्रांसाठी विद्यार्थी तसेच शेती विषयक कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांची आवश्यकता असताना अनेक तलाठी महिनोमहिने सज्जावर जातच नसल्याचे बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उघड झाले होते. याबाबतचे वृत्त गुरूवारी प्रसिद्ध होताच अनेक शेतकऱ्यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे फोन करून स्वागत केले. तसेच तलाठ्यांचे पितळ उघडे पाडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले. या वृत्ताने महसूल विभाग खडबडून जागा झाला. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सकाळीच पाचही तहसीलदार तसेच हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, वसमतच्या उपविभागीय अधिकारी अनुराधा ढालकरी यांना या प्रकरणी तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. याबाबत तसे लेखी पत्र देण्यास निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण फुलारी यांना सांगितले. या बाबत ‘लोकमत’शी बोलताना जिल्हाधिकारी पोयाम म्हणाले की, यापुढे प्रत्येक तलाठ्याने त्यांच्या सज्जावर उपस्थित राहण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यामध्येही तलाठी दोषी आढळून आले तर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांवर कारवाई केली जाईल. जनतेची गैरसोय बिलकुल खपवून घेतली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. या संदर्भात हिंगोली उपविभागीय अधिकारी तडवी यांनी हिंगोली व सेनगावचे तहसीलदार यांना त्यांचे तलाठ्यावर नियंत्रण नसल्याचे दिसून आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)पाच तलाठ्यांना बजावल्या नोटिसा सज्जावर बुधवारी गैरहजर असलेल्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील तलाठी यू.आर. डाखोरे, शिवणी बु. येथील तलाठी गंगाधर पाखरे, धानोरा (ज.) येथील भारत पडोळे, वाई येथील तलाठी जी.जी. देवकर, बाभळी येथील तलाठी चंद्रकांत धुमाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कळमनुरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कृष्णकांत चिकुर्ते यांनी सांगितली.सामुहिक तलाठी सज्जास कुलूपवसमत येथे १० ते १२ तलाठ्यांनी एकत्र येवून निर्माण केलेल्या सामुहिक तलाठी सज्जास गुरूवारी कुलूप असल्याचे दिसून आले. या कार्यालया बाहेर आसेगाव, सुनेगाव येथील ग्रामस्थ तलाठ्यांची वाट पाहत असताना दिसून आले. बेजबाबदार व शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही यावेळी या शेतकऱ्यांनी सांगितले.