शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

हिंगोली: ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले.

हिंगोली: केवळ कागदी मेळ घालत न बसता आगामी काळातील संभाव्य टंचाईची गंभीर स्थिती लक्षात घेता ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या का बंद आहेत? याची कारणे शोधून तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले.दुष्काळी स्थितीवर मात करणे एवढेच लक्ष्य ठेवता कामा नये. भविष्यात या परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी जलसंधारण, मृदसंधारण, रोहयोअंतर्गतची कामे व कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेऊन प्रभावीपणे राबविण्यात आली पाहिजे, असेही कासार म्हणाले. टप्पानिहाय टंचाई आराखडे वेळेत सादर करा. तसेच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कनिष्ठ अभियंत्यांमार्फत तपासणी करून त्या तात्काळ दुरूस्त झाल्या पाहिजे. जिल्हा परिषदेला वित्त आयोगाचा मिळालेला निधी प्राधान्याने पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वीजबिल थकल्यामुळे बंद पडलेल्या योजनांसाठी शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा. गावकऱ्यांनाही त्याबाबत मार्गदर्शन करून या योजनेचे प्रस्ताव सादर करून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यास त्यांनी सांगितले. पहिला पर्याय म्हणून बोअर घ्यायचा आहे. मात्र तो घेताना ठरविलेले स्थळ कायम राहिले पाहिजे. अंतिम पर्याय म्हणूनच टँकर वापरावे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तपासणी करूनच हे प्रस्ताव द्यावेत. साडेचार लाख पशुधनासाठी सात लाख दोन हजार मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. नवीन चारा उपलब्धतेसाठी मका, न्यूट्रीफिड बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होण्यासाठी मग्रारोहयोत कामे प्रस्तावित करून मागेल त्याला काम मिळण्याचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)