शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

बंद पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

हिंगोली: ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले.

हिंगोली: केवळ कागदी मेळ घालत न बसता आगामी काळातील संभाव्य टंचाईची गंभीर स्थिती लक्षात घेता ज्या गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्या का बंद आहेत? याची कारणे शोधून तात्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी टी.जी.कासार यांनी दिले.दुष्काळी स्थितीवर मात करणे एवढेच लक्ष्य ठेवता कामा नये. भविष्यात या परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी जलसंधारण, मृदसंधारण, रोहयोअंतर्गतची कामे व कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेऊन प्रभावीपणे राबविण्यात आली पाहिजे, असेही कासार म्हणाले. टप्पानिहाय टंचाई आराखडे वेळेत सादर करा. तसेच बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांची कनिष्ठ अभियंत्यांमार्फत तपासणी करून त्या तात्काळ दुरूस्त झाल्या पाहिजे. जिल्हा परिषदेला वित्त आयोगाचा मिळालेला निधी प्राधान्याने पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी वापरता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वीजबिल थकल्यामुळे बंद पडलेल्या योजनांसाठी शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा. गावकऱ्यांनाही त्याबाबत मार्गदर्शन करून या योजनेचे प्रस्ताव सादर करून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यास त्यांनी सांगितले. पहिला पर्याय म्हणून बोअर घ्यायचा आहे. मात्र तो घेताना ठरविलेले स्थळ कायम राहिले पाहिजे. अंतिम पर्याय म्हणूनच टँकर वापरावे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तपासणी करूनच हे प्रस्ताव द्यावेत. साडेचार लाख पशुधनासाठी सात लाख दोन हजार मे.टन चाऱ्याची आवश्यकता आहे. नवीन चारा उपलब्धतेसाठी मका, न्यूट्रीफिड बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होण्यासाठी मग्रारोहयोत कामे प्रस्तावित करून मागेल त्याला काम मिळण्याचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)