शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तीन कंपन्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: May 17, 2016 00:33 IST

वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश

वाळूज महानगर : प्रदूषण वाढविणाऱ्या व सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया न करणाऱ्या वाळूज औद्योगिक परिसरातील तीन कंपन्यांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आहेत. निर्धारित मुदतीत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबविल्यास या कंपन्यांचे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.अनेक कंपन्या चोरी-छुपे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर घातक रसायनांची विल्हेवाट लावत असल्याचे वृत्त लोकमतने गत महिन्यात प्रकाशित केले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, क्षेत्र अधिकारी स्नेहल कोचे, कल्याणी झाडपिडे आदींच्या पथकाने १८ एप्रिल व ७ मे रोजी ठिकठिकाणी पाहणी केली. या पाहणीत सांडपाण्याचे नमुने तपासणी घेऊन दोषी कंपन्यांचे उत्पादन बंद करण्याची तंबी कारखानदारांना देण्यात आली. पथकाने ७ मे रोजी वाळूज एमआयडीसीतील पूजा इंजिनिअरिंग (प्लॉट नंबर एफ-७५), धनलक्ष्मी इंटरप्रायजेस (प्लॉट नंबर-एफ-७५) व सार इंडस्ट्रीज (प्लॉट क्रमांक- एम.-१९) येथे पाहणी केली. या कंपन्यांत प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. घातक रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात होते. (पान २ वर)अहवालानंतर उर्वरित कंपन्यांवर कारवाई१८ एप्रिल रोजी मंडळाने केलेल्या पाहणीत कृष्णा इंडस्ट्रीज (प्लॉट नंबर एम.१०८/१३) या कारखान्यातील सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे दिसून आले होते. ठिकठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित कारखान्यावरही पाणी व वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.