शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

संधिसाधू नेत्यांना समाजाने हद्दपार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. ...

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. निवडणुका संपल्या की ते मैदानातून गायब होतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना कसलीही जाण नसते, अशा संधिसाधू नेत्यांना समाजानेच हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मनपा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबादसह मराठवाडाभर पक्ष बांधणीसाठी दौरा आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. मनपाच्या २५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असून, उर्वरित २५ जागांवर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार आहोत. गेली २५ वर्षे सत्ताधारी पक्षाने शहरातील गटार, रस्ते, पाणी प्रश्नाला बगल दिली आहे. शहरातील खड्डे सहन करीत पुन्हा त्याच पक्षाला निवडून दिले जाते. विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष निवडणूक लढणार आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकारे एकमेकांची जबाबदारी ढकलत आहेत. कोविडचा धाक दाखवून सरकार वेळकाढू धोरण राबवीत आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही खाजगी शाळांच्या फीसंदर्भात दादागिरी कायम आहे. कोविड काळानंतर पालक अडचणीत आहेत. त्याचा विचार केला जात नाही. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांचे शाळा, कॉलेज सुरूच केले पाहिजे. शैक्षणिक नुकसानीवर कुणी बोलत नाही. मंदिर उघडले पाहिजे, या भूमिकेतून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. शैक्षणिक पिढ्या बरबाद होत आहेत. शेतकऱ्यांना खाईत लोटणारे कायदे रद्द करा, यासाठी पक्षाची आंदोलनाची भूमिका कायम आहे, असे ॲड. सुरेश माने यांनी जाहीर केले.

यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.