शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संधिसाधू नेत्यांना समाजाने हद्दपार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. ...

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. निवडणुका संपल्या की ते मैदानातून गायब होतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना कसलीही जाण नसते, अशा संधिसाधू नेत्यांना समाजानेच हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मनपा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबादसह मराठवाडाभर पक्ष बांधणीसाठी दौरा आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. मनपाच्या २५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असून, उर्वरित २५ जागांवर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार आहोत. गेली २५ वर्षे सत्ताधारी पक्षाने शहरातील गटार, रस्ते, पाणी प्रश्नाला बगल दिली आहे. शहरातील खड्डे सहन करीत पुन्हा त्याच पक्षाला निवडून दिले जाते. विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष निवडणूक लढणार आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकारे एकमेकांची जबाबदारी ढकलत आहेत. कोविडचा धाक दाखवून सरकार वेळकाढू धोरण राबवीत आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही खाजगी शाळांच्या फीसंदर्भात दादागिरी कायम आहे. कोविड काळानंतर पालक अडचणीत आहेत. त्याचा विचार केला जात नाही. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांचे शाळा, कॉलेज सुरूच केले पाहिजे. शैक्षणिक नुकसानीवर कुणी बोलत नाही. मंदिर उघडले पाहिजे, या भूमिकेतून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. शैक्षणिक पिढ्या बरबाद होत आहेत. शेतकऱ्यांना खाईत लोटणारे कायदे रद्द करा, यासाठी पक्षाची आंदोलनाची भूमिका कायम आहे, असे ॲड. सुरेश माने यांनी जाहीर केले.

यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.