शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

संधिसाधू नेत्यांना समाजाने हद्दपार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. ...

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. निवडणुका संपल्या की ते मैदानातून गायब होतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना कसलीही जाण नसते, अशा संधिसाधू नेत्यांना समाजानेच हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मनपा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबादसह मराठवाडाभर पक्ष बांधणीसाठी दौरा आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. मनपाच्या २५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असून, उर्वरित २५ जागांवर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार आहोत. गेली २५ वर्षे सत्ताधारी पक्षाने शहरातील गटार, रस्ते, पाणी प्रश्नाला बगल दिली आहे. शहरातील खड्डे सहन करीत पुन्हा त्याच पक्षाला निवडून दिले जाते. विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष निवडणूक लढणार आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकारे एकमेकांची जबाबदारी ढकलत आहेत. कोविडचा धाक दाखवून सरकार वेळकाढू धोरण राबवीत आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही खाजगी शाळांच्या फीसंदर्भात दादागिरी कायम आहे. कोविड काळानंतर पालक अडचणीत आहेत. त्याचा विचार केला जात नाही. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांचे शाळा, कॉलेज सुरूच केले पाहिजे. शैक्षणिक नुकसानीवर कुणी बोलत नाही. मंदिर उघडले पाहिजे, या भूमिकेतून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. शैक्षणिक पिढ्या बरबाद होत आहेत. शेतकऱ्यांना खाईत लोटणारे कायदे रद्द करा, यासाठी पक्षाची आंदोलनाची भूमिका कायम आहे, असे ॲड. सुरेश माने यांनी जाहीर केले.

यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.