शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

संधिसाधू नेत्यांना समाजाने हद्दपार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. ...

औरंगाबाद : निवडणूक आली की नेते उगवतात. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फौज नाही, असे लोक समाजात नेते म्हणून मिरवितात. निवडणुका संपल्या की ते मैदानातून गायब होतात. सामाजिक प्रश्नांची त्यांना कसलीही जाण नसते, अशा संधिसाधू नेत्यांना समाजानेच हद्दपार केले पाहिजे, अशी भूमिका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केली.

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. मनपा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने औरंगाबादसह मराठवाडाभर पक्ष बांधणीसाठी दौरा आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माने बोलत होते. मनपाच्या २५ जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करणार असून, उर्वरित २५ जागांवर समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढणार आहोत. गेली २५ वर्षे सत्ताधारी पक्षाने शहरातील गटार, रस्ते, पाणी प्रश्नाला बगल दिली आहे. शहरातील खड्डे सहन करीत पुन्हा त्याच पक्षाला निवडून दिले जाते. विकासाचे मुद्दे घेऊन आपला पक्ष निवडणूक लढणार आहे.

मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर दोन्ही सरकारे एकमेकांची जबाबदारी ढकलत आहेत. कोविडचा धाक दाखवून सरकार वेळकाढू धोरण राबवीत आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही खाजगी शाळांच्या फीसंदर्भात दादागिरी कायम आहे. कोविड काळानंतर पालक अडचणीत आहेत. त्याचा विचार केला जात नाही. ज्यांनी दोन डोस घेतले असतील त्यांचे शाळा, कॉलेज सुरूच केले पाहिजे. शैक्षणिक नुकसानीवर कुणी बोलत नाही. मंदिर उघडले पाहिजे, या भूमिकेतून त्यांना काय साध्य करायचे आहे, हेच कळत नाही. शैक्षणिक पिढ्या बरबाद होत आहेत. शेतकऱ्यांना खाईत लोटणारे कायदे रद्द करा, यासाठी पक्षाची आंदोलनाची भूमिका कायम आहे, असे ॲड. सुरेश माने यांनी जाहीर केले.

यावेळी पत्रकार परिषदेला मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आदी उपस्थित होते.