शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:46 IST

औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत.

ठळक मुद्देऔरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनचे निवेदन

औरंगाबाद : काेराेनाची साथ आल्यापासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन उद्योग बंद आहे. त्यामुळे पूर्ण उद्योगच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनलॉक करण्यात येत असताना पर्यटनस्थळेही उघडण्यात यावीत, अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे पर्यटन विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे सुनीत कोठारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. कोविड आल्यापासून पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. मागील वर्षभरापासून औरंगाबादकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. या शिवाय देेशातील इतरही पर्यटकांनी येणे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे, मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटन स्थळी असलेेले दुकानदार, विविध वस्तू तयार करणारे कलाकार, महामार्गावरील रेस्टॉरंटसह इतर ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगारही हिरावलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटनस्थळे उघडावी लागणार आहेत.

शहरासह जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, ५० हजार वर्षांपूर्वीचे असलेले लोणार सरोवर आदी पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यांना येण्यासाठी ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. अनलॉकच्या प्रक्रियेत विमान सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, शॉप, ऑफिस, उद्योग, सिनेमागृहे उघडण्यात येत आहेत. हे स्तुत्य आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे उघडल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद