शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:46 IST

औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत.

ठळक मुद्देऔरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनचे निवेदन

औरंगाबाद : काेराेनाची साथ आल्यापासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन उद्योग बंद आहे. त्यामुळे पूर्ण उद्योगच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनलॉक करण्यात येत असताना पर्यटनस्थळेही उघडण्यात यावीत, अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे पर्यटन विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे सुनीत कोठारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. कोविड आल्यापासून पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. मागील वर्षभरापासून औरंगाबादकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. या शिवाय देेशातील इतरही पर्यटकांनी येणे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे, मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटन स्थळी असलेेले दुकानदार, विविध वस्तू तयार करणारे कलाकार, महामार्गावरील रेस्टॉरंटसह इतर ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगारही हिरावलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटनस्थळे उघडावी लागणार आहेत.

शहरासह जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, ५० हजार वर्षांपूर्वीचे असलेले लोणार सरोवर आदी पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यांना येण्यासाठी ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. अनलॉकच्या प्रक्रियेत विमान सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, शॉप, ऑफिस, उद्योग, सिनेमागृहे उघडण्यात येत आहेत. हे स्तुत्य आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे उघडल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद