शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:46 IST

औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत.

ठळक मुद्देऔरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनचे निवेदन

औरंगाबाद : काेराेनाची साथ आल्यापासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन उद्योग बंद आहे. त्यामुळे पूर्ण उद्योगच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनलॉक करण्यात येत असताना पर्यटनस्थळेही उघडण्यात यावीत, अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे पर्यटन विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे सुनीत कोठारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. कोविड आल्यापासून पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. मागील वर्षभरापासून औरंगाबादकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. या शिवाय देेशातील इतरही पर्यटकांनी येणे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे, मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटन स्थळी असलेेले दुकानदार, विविध वस्तू तयार करणारे कलाकार, महामार्गावरील रेस्टॉरंटसह इतर ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगारही हिरावलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटनस्थळे उघडावी लागणार आहेत.

शहरासह जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, ५० हजार वर्षांपूर्वीचे असलेले लोणार सरोवर आदी पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यांना येण्यासाठी ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. अनलॉकच्या प्रक्रियेत विमान सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, शॉप, ऑफिस, उद्योग, सिनेमागृहे उघडण्यात येत आहेत. हे स्तुत्य आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे उघडल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद