शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:46 IST

औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत.

ठळक मुद्देऔरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनचे निवेदन

औरंगाबाद : काेराेनाची साथ आल्यापासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन उद्योग बंद आहे. त्यामुळे पूर्ण उद्योगच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनलॉक करण्यात येत असताना पर्यटनस्थळेही उघडण्यात यावीत, अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे पर्यटन विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे सुनीत कोठारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. कोविड आल्यापासून पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. मागील वर्षभरापासून औरंगाबादकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. या शिवाय देेशातील इतरही पर्यटकांनी येणे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे, मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटन स्थळी असलेेले दुकानदार, विविध वस्तू तयार करणारे कलाकार, महामार्गावरील रेस्टॉरंटसह इतर ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगारही हिरावलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटनस्थळे उघडावी लागणार आहेत.

शहरासह जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, ५० हजार वर्षांपूर्वीचे असलेले लोणार सरोवर आदी पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यांना येण्यासाठी ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. अनलॉकच्या प्रक्रियेत विमान सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, शॉप, ऑफिस, उद्योग, सिनेमागृहे उघडण्यात येत आहेत. हे स्तुत्य आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे उघडल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद