शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवरील शौचालये नागरिकांसाठी खुली करा; औरंगाबाद महापालिकेची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:46 IST

शौचालयांसाठीची मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये नागरिकांसाठीही खुली करण्याची मुभा द्यावी...

ठळक मुद्दे. महापालिका स्वत:हून १०० शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सुलभ इंटरनॅशनलने शहरात मागील दोन महिन्यांपासून सर्वेक्षण केले.

औरंगाबाद : शहरातील सार्वजनिक   शौचालये  लोकसंख्येच्या प्रमाणात  नगण्य असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातही महापालिकेला कमी शौचालयांमुळे तीन वर्षांपासून कमी गुण मिळत आहेत. महापालिका स्वत:हून १०० शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. खाजगी संस्थेच्या सहकार्याने शौचालय उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत, शहरातील पेट्रोलपंपांवरील शौचालयेही  नागरिकांसाठी खुली करावीत, अशी विनंती महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सुलभ इंटरनॅशनलने शहरात मागील दोन महिन्यांपासून सर्वेक्षण केले. यात शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे निवडण्यात आली. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी शौचालये उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वात मोठा प्रश्न जागेचा आहे. अनेक ठिकाणी शौचालय उभारणीस विरोध होतो.  या जागांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेने आरक्षणे टाकलेली आणि ताब्यात घेतलेल्या जागांचाही विचार सुरू आहे. या सर्व प्रक्रियेला किमान ६ महिने लागणार आहेत. संपूर्ण १०० शौचालये उभारण्यास वर्षाचा काळ लागू शकतो.

महापालिकेवर शहरात  शौचालये उभारण्याचे दायित्व आहे. आजपर्यंत प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात शौचालयांसाठी वेगळे गुण देण्यात येतात. मनपाने व्यापक प्रमाणात शौचालये उभारली नाहीत. त्यामुळे दरवर्षी मनपाला कमी गुण मिळत आहेत. शौचालयांसाठीची मोहीम पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व पेट्रोल पंपांवरील शौचालये नागरिकांसाठीही खुली करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

इंदूर शहरात प्रत्येक रस्त्यावर शौचालयइंदूर महापालिकेने शहरातील प्रत्येक रस्त्यावर शौचालयाची व्यवस्था केली आहे. औरंगाबाद महापालिकेने कचरा प्रश्नात इंदूर पॅटर्नचा अवलंब केला आहे. शौचालयेही त्याच धर्तीवर उभारण्यात येणार आहेत. महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने खाजगी संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान