शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उघड चौकशीचा अहवाल गुलदस्त्यातच

By admin | Updated: June 23, 2016 01:06 IST

गंगाराम आढाव , जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार, अपसंपदा आदीबाबत आलेल्या तक्रारीवरून तसेच काही अपसंपदाच्या संशयावरून अशा एकूण

गंगाराम आढाव , जालनालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार, अपसंपदा आदीबाबत आलेल्या तक्रारीवरून तसेच काही अपसंपदाच्या संशयावरून अशा एकूण २०१३ ते २०१५ या काळात पाच अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात आली. मात्र या उघड चौकशीचा अहवाल अतिशय गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यावरील कार्यवाहीचा प्रस्ताव लालफित बंद असून, अद्याप एकाही प्रकरणावर निर्णय झालेला नसल्याने उघड चौकशी केवळ फार्स ठरत असल्याची चर्चा होत आहे.जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने गेल्याने तीन वर्षात पाच अधिकाऱ्यांची शासनाकडून प्राप्त झालेल्या उघड चौकशी आदेशान्वये उघड चौकशी केलेली आहेत. त्यात भोकरदनचे तत्कालिन कृषी अधिकारी बोदरवाड यांची २६ नोव्हेंबर २०१३ पासून उघड चौकशी सुरू करण्यात आली. २२ मे २०१५ रोजी मुख्यालयाच्या पत्रानुसार त्रुटीपूर्ततेसाठी बोदरवाड यांचे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले. तत्कालिन वन परिक्षेत्र अधिकारी जालना मोहन कासार यांची १८ जून २०१४ पासून उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. घनसावंगी पंचायत समितीच्या तत्कालिन गटविकास अधिकारी वर्षा पवार यांची १ सप्टेंबर २०१४ पासून, घनसावंगीचे तत्कालिन तहसीलदार अभय चव्हाण यांची ११ नोव्हेंबर २०१४ पासून तसेच महावितरणचे तत्कालिन अधीक्षक अभियंता ए. जे. नवघरे यांची १४ मे २०१५ पासून चौकशी सुरू करण्यात आली होती. कृषि अधिकारी बोदरवाड व घनसावंगीचे तहसीलदार चव्हाण यांची चौकशी त्रुटी पुर्ततेवर तर उर्वरीत तिघांची चौकशी अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान गेल्या तीन वर्षांत या पाच अधिकाऱ्यांची उघड चौकशी झाली. मात्र चौकशीत काय निष्पन्न झाले हेच अद्याप उघड झाले नाही.