शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
3
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
4
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
5
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
6
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
8
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
9
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
10
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
11
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
13
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
14
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
15
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:19 AM

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे.

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अ‍ॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु एप्रिल महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा असल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.

सध्या महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे आणि रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर होत आहे. रक्त, रक्तघटकाची मागणी अधिक आणि साठा कमी अशी अवस्था झाली आहे. अनेक रुग्णांची खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते.

परिणामी गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठीच रक्त उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अ‍ॅनेमियासह अनेक आजारांच्या रुग्णांना रक्तासाठी वेटिंगवर ठेवले जात आहे. या रुग्णांना पाच ते सहा दिवस उशिरा रक्त दिले तरी चालते, असे विभागीय रक्तपेढीतील सूत्रांनी म्हटले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी