शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 11:00 IST

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे.

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अ‍ॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु एप्रिल महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा असल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.

सध्या महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे आणि रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर होत आहे. रक्त, रक्तघटकाची मागणी अधिक आणि साठा कमी अशी अवस्था झाली आहे. अनेक रुग्णांची खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते.

परिणामी गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठीच रक्त उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अ‍ॅनेमियासह अनेक आजारांच्या रुग्णांना रक्तासाठी वेटिंगवर ठेवले जात आहे. या रुग्णांना पाच ते सहा दिवस उशिरा रक्त दिले तरी चालते, असे विभागीय रक्तपेढीतील सूत्रांनी म्हटले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी