शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 11:00 IST

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे.

औरंगाबाद : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत.

घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग संस्था) मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. घाटीत अपघाताचे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही अधिक आहे. दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेच्या वेळी विविध शस्त्रक्रियांसाठी आणि थॅलेसेमिया, अ‍ॅनेमियासह इतर आजारांसाठी रक्त, रक्तघटकांची आवश्यकता असते. घाटीतील विभागीय रक्तपेढीमध्ये दररोज जवळपास सुमारे ६० ते ७० बॅग रक्त आणि रक्तघटकांची मागणी असते; परंतु एप्रिल महिन्यापासून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा असल्यामुळे गरजू रुग्णांची गैरसोय होत आहे.

सध्या महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्यामुळे आणि रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्तपेढीतील रक्तसाठ्यावर होत आहे. रक्त, रक्तघटकाची मागणी अधिक आणि साठा कमी अशी अवस्था झाली आहे. अनेक रुग्णांची खासगी रक्तपेढीतून रक्त घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते.

परिणामी गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक असलेल्या रुग्णांसाठीच रक्त उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात आहे. अ‍ॅनेमियासह अनेक आजारांच्या रुग्णांना रक्तासाठी वेटिंगवर ठेवले जात आहे. या रुग्णांना पाच ते सहा दिवस उशिरा रक्त दिले तरी चालते, असे विभागीय रक्तपेढीतील सूत्रांनी म्हटले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी