शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

फक्त दिवाळीलाच मिळते साखर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड स्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण

व्यंकटेश वैष्णव , बीडस्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सांगितले. यावर प्रशासनाने आता पर्यंत कसलीच कारवाई केलेली नसल्याचे पहावयास मिळते.शासनाने गोरगरीबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधारांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०० लाभार्थी असून यांना अद्यापही पुरवठा विभागाकडून धान्य मिळालेले नाही. आॅगस्ट २०१४ चे साखरेचे नियतन मंजूर असून २० आॅगस्टपर्यंत साखरेचे वितरण करण्याच्या सूचना पत्रकात दिलेल्या आहेत. असे असताना देखील नागरिकांना साखर मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी साखर मिळालेली नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.बहुतांश गावच्या ग्रामस्थांनी सांगितले की, २०१३ च्या दिवाळीलाच आमच्या गावात स्वस्त धान्य दुकानावर साखर आली होती. त्यानंतर आम्हाला साखर मिळालीच नाही. ग्रामस्थांनी असे उत्तर दिले असल्याने पुरवठा विभागाच्या धान्य वितरण करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.अगोदरच महागाई व दुष्काळ याने जनता होरपळली आहे. यातच जनतेसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा देखील काळाबाजार होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी पुरवठा अधिकारी एस़ व्ही़ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, आलेली साखर नेमकी जाते कोठे ? याचे कोडे उलगडलेले नाही़ धान्याबरोबरच साखरेची विल्हेवाट लावणारी टोळीच कार्यरत झाली आहे़ अधिकारीच दलाल बनल्यामुळे गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचा आरोप अरिहंत नेहरु युवाचे ललित अब्बड यांनी केला आहे़