शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

फक्त दिवाळीलाच मिळते साखर

By admin | Updated: August 21, 2014 01:23 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड स्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण

व्यंकटेश वैष्णव , बीडस्वस्त धान्य दुकानांवर साखरेचे वाटप होत नसल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे. दिवाळी ते दिवाळीच स्वस्त धान्य दुकानांवर साखर येत असल्याचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सांगितले. यावर प्रशासनाने आता पर्यंत कसलीच कारवाई केलेली नसल्याचे पहावयास मिळते.शासनाने गोरगरीबांना स्वस्तात धान्य मिळावे यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये अन्नपूर्णा योजने अंतर्गत निराधारांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०० लाभार्थी असून यांना अद्यापही पुरवठा विभागाकडून धान्य मिळालेले नाही. आॅगस्ट २०१४ चे साखरेचे नियतन मंजूर असून २० आॅगस्टपर्यंत साखरेचे वितरण करण्याच्या सूचना पत्रकात दिलेल्या आहेत. असे असताना देखील नागरिकांना साखर मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी साखर मिळालेली नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.बहुतांश गावच्या ग्रामस्थांनी सांगितले की, २०१३ च्या दिवाळीलाच आमच्या गावात स्वस्त धान्य दुकानावर साखर आली होती. त्यानंतर आम्हाला साखर मिळालीच नाही. ग्रामस्थांनी असे उत्तर दिले असल्याने पुरवठा विभागाच्या धान्य वितरण करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.अगोदरच महागाई व दुष्काळ याने जनता होरपळली आहे. यातच जनतेसाठी येणाऱ्या स्वस्त धान्याचा देखील काळाबाजार होत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी पुरवठा अधिकारी एस़ व्ही़ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.दरम्यान, आलेली साखर नेमकी जाते कोठे ? याचे कोडे उलगडलेले नाही़ धान्याबरोबरच साखरेची विल्हेवाट लावणारी टोळीच कार्यरत झाली आहे़ अधिकारीच दलाल बनल्यामुळे गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्याचा आरोप अरिहंत नेहरु युवाचे ललित अब्बड यांनी केला आहे़