शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या अग्रिमपासून वंचित

By बापू सोळुंके | Updated: December 13, 2023 16:15 IST

पीक विमा कंपनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाला जुमेना

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ६९ तालुक्यांमध्ये खरीप हंगामात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ४२७ मंडळांतील पिके वाळून गेली होती. या शेतकऱ्यांना पीक विम्याचे २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले होते. या आदेशाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या विमा कंपनीने केराची टोपली दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात काही तालुक्यांत आणि मंडळात तर २१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाने खंड दिला होता. पीक विमा कंपनीसोबत शासनाने केलेल्या करारानुसार पावसाचा सलग २१ दिवस खंड असेल तर संबंधित मंडळातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ५७ कृषी मंडळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील २० मंडळ, बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील ५६ मंडळे, लातूर जिल्ह्यात ८ तालुक्यातील ३२ मंडळ, धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५७ मंडळ, नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ९३ मंडळांत आणि परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ५२ महसूल मंडळ अशी एकूण ६९ तालुक्यातील ४२७ मंडळांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, या मंडळातील खरीप हंगामातील कापूस, मका आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. ही बाब कृषी अधिकारी, तहसीलदार आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पंचनाम्यात स्पष्ट झाली होती. तेव्हा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपन्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रिम रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ लाख ३२ हजार २४८ शेतकऱ्यांना ८५ कोटी २७ लाख ७९ हजार रुपये दिवाळीपूर्वीच अदा करणे विमा कंपनीला बंधनकारक होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरसाठी कार्यरत असलेल्या एम.एस. चोलामंडल विमा कंपनीने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रिम जमा केली नसल्याचे दिसून येते.

पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाले ९३८ कोटी ३६ लाखमराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ४ लाख ३८,८४६ शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने आतापर्यंत १३६ कोटी ५७ लाख रुपये दिले आहे, तर २५ कोटी २७ लाख रुपये देणे बाकी आहे. बीड जिल्ह्यातील ७ लाख ७१ हजार ३३८ शेतकऱ्यांना २४१ कोटी ४७ लाख रुपये देय होते. यापैकी २१३ कोटी ४ लाख शेतकऱ्यांना अदा केले. २८ कोटी ४२ लाख ९० हजार रुपये देणे आहे. लातूर जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ९३ शेतकरी पीक विम्याच्या अग्रिम रकमेसाठी पात्र आहेत. त्यांना २१५ कोटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. संबंधित विमा कंपनीने लातूरच्या शेतकऱ्यांना १९७ कोटी रुपये अदा केले. १८ कोटी रुपये देय बाकी आहे. धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ६० हजार ३५२ शेतकऱ्यांना २१८ कोटी रुपये अदा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. यापैकी २१४ कोटी रुपये विमा कंपनीने दिले. परभणी जिल्ह्यातील ४ लाख २४ हजार २८० शेतकऱ्यांना १९४ कोटी ५० लाख रुपये देय होते. यापैकी १७७ कोटी ७५ लाख रुपये कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrop Insuranceपीक विमाAgriculture Sectorशेती क्षेत्र