शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

इतिहासाचे पुनर्लेखन हा एकमेव अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:54 IST

भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.

ठळक मुद्देऔरंगाबादेत एसएफआय संमेलन : पी.साईनाथ यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियातर्फे विद्यापीठातील नाट्यगृहात २ ºया राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन पी. साईनाथ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव होते. तर एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, राष्ट्रीय सचिव विक्रमसिंग, स्वागताध्यक्ष भगवान भोजणे, राज्य सचिव बालाजी कलेटवाड, मंजूश्री कबाडे, रोहिदास जाधव, अ‍ॅड. सुनील राठोड यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पी. साईनाथ यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली. रवींद्रनाथ टागोर यांनी आदिवासी भागात जाऊन कृषी महाविद्यालय उभारले. पुढे हे शांतीनिकेतन झाले. त्याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. सध्याच्या कुलगुरूंनी लालसेपोटी विद्यापीठात चक्क गोशाळा उघडली आहे. यासाठी कारण दिले की, रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा दुधासाठी गायी पाळायचे. त्याचे गोशाळा हे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०० गायींची खरेदी करण्यात येत आहे. यातील ४० मिळाल्या आहेत. कर्मचारी, ठेकेदारांना देण्यासाठी पैसा नाही. तेथे गायी आणल्या जात आहेत. सीएसआरच्या फंडातूनही गोशाळा उभारण्यात येत आहेत, हे धोकादायक आहे. आपले पंतप्रधान कार्यालय रोहित वेमुला हा दलित नव्हता हे सिद्ध करण्यासाठी हस्तक्षेप करते, यावरून देश कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येत असल्याचेही साईनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकाळात उद्योगपतींना फायदा पोहोचविण्याचा वेग कमी होता. मात्र, विद्यमान सरकार उद्योगपतींसाठीच कार्य करते. पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीसाठी वापरण्यात येतो. यातच सर्व काही आले. विक्रमसिंग, भगवान भोजणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. सुनील राठोड यांनी केले.